ICC Worldcup 2025 : भारताच्या लेकींनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिला 'हा' सर्वात मोठा संदेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण कोरला गेला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) जसे नादिन डिक्लर्कची  (Nadine de Klerk) निर्णायक झेल (Crucial Catch) पकडली, त्याच क्षणी इतिहास घडला. भारतीय महिला टीमने (Indian Women's Team) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) पराभूत करत पहिल्यांदाच वर्ल्ड कप विजेतेपद आपल्या नावावर केले. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशाला गर्वाने भरून टाकले. मैदानावरील चाहत्यांचा प्रचंड जल्लोष आणि खेळाडूंच्या डोळ्यातील आनंदाचे अश्रू या दरम्यान, ही जीत केवळ एका खेळात मिळालेला विजय नव्हता. हा विजय दूरदर्शी नीती, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि संघभावनेचा विजय होता. ५२ वर्षांच्या वर्ल्ड कप प्रवासात भारताने अखेर आपले स्थान निश्चित केले.



BCCI च्या ऐतिहासिक निर्णयाने 'समान संधी'चा मार्ग झाला मोकळा


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतलेल्या एका दूरदर्शी आणि धाडसी धोरणाचा देखील विजय आहे. वास्तविक पाहता, ऑक्टोबर २०२२ मध्ये BCCI ने एक मोठा आणि साहसी निर्णय घेतला होता. बीसीसीआयच्या १५ व्या सर्वोच्च परिषद बैठकीत, महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मॅच फी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेटर्सना पुरुष खेळाडूंच्या बरोबरीने मॅच फी मिळणार होती. आर्थिक समानता (Financial Equality) मिळाल्यानंतर, महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी पूर्ण एकाग्रतेने खेळावर लक्ष केंद्रित केले, ज्याचा परिणाम वर्ल्ड कप विजयाच्या रूपात आज दिसतो आहे. हा निर्णय भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट (Turning Point) मानला जातो.



समान वेतनाच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना महिला संघाचे सडेतोड उत्तर


समान वेतनाचा विचार न करता, त्याला वास्तविकतेत बदलणाऱ्या जगातील मोजक्याच क्रीडा बोर्डांमध्ये BCCI चा समावेश झाला. या निर्णयावर त्या वेळी काही टीकाकारांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यांचे म्हणणे होते की, महिला क्रिकेट अजून पुरुष क्रिकेट इतके लोकप्रिय किंवा कमाई करणारे नाही. काही जणांनी तर या निर्णयाला आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसून केवळ 'भावनात्मक निर्णय' असेही म्हटले होते. मात्र, BCCI चा हा निर्णय 'गेमचेंजर' ठरला. तीन वर्षांनंतर, भारतीय महिलांनी जेव्हा वर्ल्ड कप ट्रॉफी (World Cup Trophy) उंचावली, तेव्हा त्या सर्व टीका आणि प्रश्नांना आपोआप उत्तर मिळाले. महिलांनी त्यांच्या कामगिरीतून, समान संधी आणि समान सन्मान मिळाल्यास त्या जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात, हे सिद्ध केले.



'या यशामागे दूरदृष्टीच्या धोरणांचा हात': जय शाह यांनी महिला संघाला दिले खास श्रेय




भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक जिंकल्यानंतर, आयसीसीचे विद्यमान चेअरमन आणि माजी बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी 'एक्स' पोस्टद्वारे टीमचे अभिनंदन केले आहे, परंतु त्यांच्या या विधानात केवळ शुभेच्छा नव्हत्या, तर दूरदृष्टीच्या धोरणांची झलक होती. जय शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, "भारतीय महिला टीमची ही यात्रा अद्भुत राहिली आहे. खेळाडूंचा जिद्द, मेहनत आणि कौशल्य यांनी देशाला प्रेरित केले आहे." "पण, आपल्याला त्या धोरणांनाही लक्षात ठेवले पाहिजे, ज्यांनी हे यश शक्य केले, वाढलेली गुंतवणूक, समान वेतन, उत्तम कोचिंग स्टाफ आणि महिला प्रीमियर लीगचा अनुभव यामुळे टीम मोठ्या आव्हानांसाठी तयार झाली." शाह यांचे हे वक्तव्य केवळ अभिनंदनपर नव्हते, तर भारतीय महिला क्रिकेटला (Indian Women's Cricket) एका नव्या उंचीवर नेणाऱ्या प्रशासकीय दूरदृष्टीचे स्पष्टीकरण होते.



'हा विजय योगायोग नाही!' मजबूत सिस्टीम आणि WPL चा मोलाचा वाटा


बीसीसीआयने (BCCI) महिला क्रिकेटला मजबूत करण्यासाठी एक व्यवस्थित ढाचा तयार केला, ज्याचे हे यश आहे. बीसीसीआयचे महत्त्वाचे टप्पे, समान वेतन, आर्थिक समानतेमुळे खेळाडूंचे मनोबल वाढले. उत्कृष्ट सुविधा (Better Facilities) आणि कोचिंग स्ट्रक्चर यामुळे खेळाडूंच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या. महिला प्रीमियर लीग सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे WPL ची सुरुवात. WPL मुळे भारतीय खेळाडूंना जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांच्या आत्मविश्वासामध्ये आणि प्रदर्शनामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. या यशामुळे 'महिला क्रिकेट फक्त एका सुपरस्टारमुळे पुढे जात आहे,' हा गैरसमज मोडीत निघाला. संस्था खेळाडूंवर विश्वास ठेवतात, समान संधी देतात आणि गुंतवणूक करतात, तेव्हाच संपूर्ण सिस्टीम मजबूत होऊन खरे यश मिळते, हे या विजयाने सिद्ध केले आहे.



समान वेतन धोरणामुळे महिला खेळाडूंच्या मानसिकतेत मोठा बदल




बीसीसीआयच्या (BCCI) समान वेतन धोरणाने भारतीय महिला खेळाडूंसाठी एक मोठा मानसिक आणि व्यावहारिक बदल घडवून आणला. त्यांना हा ठाम विश्वास मिळाला की, त्यांची मेहनत आणि योगदान याला पुरुषांच्या बरोबरीचा सन्मान मिळत आहे. या मानसिक समाधानामुळे खेळाडूंना कोणत्याही आर्थिक चिंतेशिवाय आपले संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित करण्याची संधी मिळाली. सुधारित मानधनामुळे आता महिला क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षक, ट्रेनर आणि विश्लेषक जोडले गेले. यामुळे संपूर्ण टीमचा खेळण्याचा स्तर उंचावला. फिटनेस, फील्डिंग आणि रणनीती, प्रत्येक विभागात भारतीय महिला टीम अधिक मजबूत झाली. त्यांनी 'कुणाच्या कृपेमुळे नव्हे, तर बरोबरीमुळे मिळणाऱ्या' आत्मविश्वासाने खेळायला सुरुवात केली.



हा विजय केवळ भारताचा नाही, संपूर्ण जगासाठी आहे संदेश


भारतीय महिला संघाचा हा ऐतिहासिक विजय केवळ भारतापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण जगासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. अनेक वर्षांपासून महिला खेळाडूंना सांगितले जात होते की, 'आधी तुम्ही तुमच्या खेळाला व्यावसायिक बनवा, मग तुम्हाला बरोबरी मिळेल'. पण भारताने या विजयातून सिद्ध केले की, 'बराबरी हीच यशाची कारण बनू शकते.' अमेरिकेच्या महिला फुटबॉल संघाला समान वेतनासाठी अनेक वर्षे कोर्टात लढावे लागले. तर भारतात, बीसीसीआयने कोणताही मोठा संघर्ष न होता, केवळ विश्वास आणि धोरणात्मक निर्णयांच्या माध्यमातून हा बदल आधीच केला आणि त्याचे गोड फळ आज समोर आहे.



हरमनप्रीतने उचललेली ट्रॉफी 'बराबरी आणि विश्वासाची' जीत!


महिला खेळाडूंचे यश आता सिस्टीमच्या विरोधात नाही, तर सिस्टीमच्या मदतीने मिळताना दिसत आहे. प्रथमच असे जाणवते आहे की, देशातील संस्था वास्तविक अर्थाने महिला ॲथलीट्सच्या बाजूने खंबीरपणे उभ्या आहेत. हरमनप्रीत कौर ब्रिगेडने (Harmanpreet Kaur Brigade) जी वर्ल्ड कप ट्रॉफी (World Cup Trophy) उंचावली, ती केवळ क्रिकेटची नाही, तर बराबरी आणि विश्वासाची जीत आहे. फक्त तीन वर्षांपूर्वी एका व्हिडीओ कॉलवर (Video Call) पास झालेला समान वेतनाचा प्रस्ताव, आज भारताची सर्वात मोठी क्रीडा कहाणी बनला आहे.

Comments
Add Comment

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ

हेटमायर आणि पॉवेलमुळे वेस्ट इंडिजने ओलांडला २५० धावांचा टप्पा

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

T20 World Cup 2026 Ind vs SA : आपण पॉवरप्लेमध्येच सामना गमावला - सूर्यकुमार यादव

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा ४३ वा सामना अहमदाबाद येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. हा सामना