कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून देशाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला. यापूर्वी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने भारतासाठी दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकले आहेत. कपिल देव यांनी १९८३ मध्ये भारताला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने भारताला दुसऱ्या एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकून दिली. आता, हरमनप्रीतनेही इतिहासात आपले नाव कोरले आहे.


महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ गडी गमावून २९८ धावा केल्या. २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका ४५.३ षटकांत २४६ धावांवर ऑलआउट झाली आणि भारतीय महिला क्रिकेट संघाने ५२ धावांनी सामना जिंकून विश्वचषक जिंकला.


महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २ एप्रिल २०११ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला. २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात धोनीने भारतासाठी विजयी षटकार मारला. भारतासाठी धोनीने ७९ चेंडूत ९१ धावा केल्या. गौतम गंभीरने ९७ धावा केल्या. श्रीलंकेसाठी महेला जयवर्धनेने १०३ धावा केल्या होत्या. दरम्यान, भारताने २८ वर्षांनंतर दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.


कपिल देव यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटचा सुवर्ण इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. १९८३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघा विश्वचषक उंचावेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. पण कपिल देव यांच्या संघाने अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताला पहिले एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले होते. त्यावेळी वेस्ट इंडिजचा पराभव करणे अशक्य मानले जात होते. पण भारताने ट्रॉफी जिंकून इतिहास रचला होता.


६० षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघ ५४.४ षटकात १८३ धावांवर ऑलआउट झाला. भारताकडून कृष्णमाचारी श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर ५२ षटकांत १४० धावांतच गारद झाला आणि भारताचा ४३ धावांनी विजय निश्चित झाला आणि पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी तीन, तर कपिल देव आणि रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती.


हरमनप्रीत कौरने भारतासाठी पहिली-वहिली महिला विश्वचषक ट्रॉफी उंचावत कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीच्या पंक्ती स्थान मिळवले आहे. आतापर्यंत भारतासाठी या तीन कर्णधारांनी विश्वचषकचे विजेतेपद पटकावले आहे. हरमनप्रीत कौरच्या या टीमने मिळवलेल्या सोनेरी यशाने भारतीय महिला क्रिकेटला एक नवी उमेद मिळणार आहे. ज्याप्रमाणे १९८३चा विश्वचषक भारताने जिंकल्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेटचा चेहरा बदलला होता. त्याचप्रमाणे महिलांच्या या देदिप्यमान कामगिरीमुळे निश्चितच भारतीय महिला क्रिकेट एक नवी उंची गाठेल यात शंकाच नाही.

Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस