वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या प्रकाराला आता आळा घातला जाणार असून या मार्गावरील तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा त्वरीत होण्यासाठी महापालिकेच्यावतीने याचा शोध घेवू त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे. याठिकाणचे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या पर्जन्य जलवाहिनी या मोडकळीस असल्याने तसेच काही वाहिन्या अस्तित्वातच नसल्याने अशा मिसिंग लिंकचा शोध घेवून कामाला सुरुवात केल्याने या भागातील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायमचीच निकालात निघाली जाणार आहे.


वांद्रे पश्चिम भागातील एस व्ही रोड आणि के सी रोड येथे पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात पाणी साचून राहत असल्याने स्थानिकांसह लोकप्रतिनिधीकडून वारंवार तक्रारी येत असल्याने महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये पर्जन्य जलवाहिनी या मोडकळीस आलेल्या असल्यामुळे तसेच काही ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या अस्तित्वात नसल्यामुळे या ठिकाणच्या पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी पावसाचे पाणी साचत आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी अस्तित्वात असलेली यंत्रणा अपुरी असल्यामुळे जलवाहिन्यांची रुंदी ही १.२ मीटर एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


त्यानुसार पर्जन्य जलवाहिची क्षमता वाढवण्याच्यादृष्टीकोनातून हाती कामे घेण्याकरता निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी ११.२३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामांसाठी


नरेंद्र एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन पावसाळ्यात पाणी साचण्याच्या प्रकाराला आळा बसेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Health Department : आरोग्य विभागाच्या बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने

Ambernath Local : अंबरनाथ लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल ट्रेन. याच लोकल ट्रेनमध्ये जेव्हा मारामारी होते, ती सोशल

Food Poisoning : मुंबईत धक्कादायक प्रकार! 'आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं...'; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील