वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या प्रकाराला आता आळा घातला जाणार असून या मार्गावरील तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा त्वरीत होण्यासाठी महापालिकेच्यावतीने याचा शोध घेवू त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे. याठिकाणचे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या पर्जन्य जलवाहिनी या मोडकळीस असल्याने तसेच काही वाहिन्या अस्तित्वातच नसल्याने अशा मिसिंग लिंकचा शोध घेवून कामाला सुरुवात केल्याने या भागातील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायमचीच निकालात निघाली जाणार आहे.


वांद्रे पश्चिम भागातील एस व्ही रोड आणि के सी रोड येथे पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात पाणी साचून राहत असल्याने स्थानिकांसह लोकप्रतिनिधीकडून वारंवार तक्रारी येत असल्याने महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये पर्जन्य जलवाहिनी या मोडकळीस आलेल्या असल्यामुळे तसेच काही ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या अस्तित्वात नसल्यामुळे या ठिकाणच्या पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी पावसाचे पाणी साचत आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी अस्तित्वात असलेली यंत्रणा अपुरी असल्यामुळे जलवाहिन्यांची रुंदी ही १.२ मीटर एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


त्यानुसार पर्जन्य जलवाहिची क्षमता वाढवण्याच्यादृष्टीकोनातून हाती कामे घेण्याकरता निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी ११.२३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामांसाठी


नरेंद्र एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन पावसाळ्यात पाणी साचण्याच्या प्रकाराला आळा बसेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Ashwini bhide : नगरसेवकांच्या सहभागातून आता विहिरींमधील पाण्याचा वापर

  महापालिका आयुक्त भिडे यांनी विहिरींची स्वच्छता करण्याचे निर्देश   मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या

Municipal Commissioner's administration : महानगरपालिकेच्‍या अधिकारी - कर्मचा-यांना 'ए.आय.' बाबत प्रशिक्षण

महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश मुंबई : 'उपयोग ' हा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी डिजिटल

Additional Municipal Commissioner : एसआयआरच्या कार्यक्रमासाठी रुजू न झालेल्या बीएलओंविरोधात पोलिसांत दाखल करणार गुन्हा

महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिले स्पष्ट निर्देश मुंबई: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार

Agriculture Minister Dattatray Bharne : कृषी मित्र भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा; फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

कृषी मित्र भरतीच्या नावाखालील फसवणुकीला बळी पडू नका; शेतकरी व युवकांना कृषी मंत्र्यांचे आवाहन मुंबई : मुंबई

Mobile Network in Metro 3 Aqua Line : अखेर तीन महिन्यांनी झाला ‘नो नेटवर्क’चा अंत! मेट्रो-3च्या ॲक्वा लाईनमध्ये मोबाईल सेवा सुरळीत सुरु

- दररोज होणार दीड लाख प्रवाशांना फायदा मुंबई : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ भूमिगत प्रवासादरम्यान मोबाईल

Shrikant Shinde : ‘टिप नाही तर राईड नाही!’ ॲप-आधारित टॅक्सींच्या मनमानीविरोधात श्रीकांत शिंदे आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

मुंबई : ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांची होत असलेली आर्थिक लूट आणि मनमानी थांबवण्यासाठी