साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने


पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले. अन्य ३३ कारखान्यांच्या परवान्यांची तपासणी साखर आयुक्तालयाच्या स्तरावर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत त्यावर निर्णय होणार आहे, तर उर्वरित कारखान्यांच्या परवान्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता आणि निधी भरण्याची प्रक्रिया प्रादेशिक स्तरावर सुरू असल्याची माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने राज्यातील गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. त्या निर्णयाची शनिवारपासून अंमलबजावणी झाली. परवाने देण्याची प्रक्रिया साखर आयुक्तालयामार्फत सुरू आहे. ७२ कारखान्यांच्या प्रस्तावांवर प्रादेशिक स्तरावर कार्यवाही सुरू आहे. ७८ कारखान्यांच्या परवान्यांबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित कारखान्यांना देण्यात आल्याचेही डॉ. कोलते यांनी सांगितले. ऊस गाळपाशी संबंधित विविध निधी भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी हमीपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


गेल्यावर्षी रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) पूर्ण दिल्याशिवाय कारखान्यांना नवीन परवाना दिला जाणार नाही, अशी भूमिका आयुक्तालयाकडून घेण्यात आली आहे. त्याची पडताळणी आणि तांत्रिक कारणांमुळे कारखान्यांचे परवाने देण्यास अधिक वेळ लागत आहे.


दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत


हंगामापूर्वीच परवान्याविना सुरू झालेल्या सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तीन कारखान्यांना आयुक्तालयाकडून दंड करण्यात आला आहे. या कारखान्यांना दंड स्वरूपात आठ रुपये प्रतिटनाप्रमाणे कारखान्यांना पैसे भरावे लागणार आहेत. यामधील काही रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे महामंडळासाठी जमा केली जाणार आहे.



Comments
Add Comment

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

राज्यातील 'आयटीआय' होणार 'स्किल डेव्हलमपेंट हब'

मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान

Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा! 'त्या' एका मिठीसाठी व्याकुळ झाला पुतण्या

मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, धडाडीचे आणि अत्यंत कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे