नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर


मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ म्हणजेच ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर करण्यात आले आहे. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये सी-ट्रिपल आयटी उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. कंपनीकडून पत्रास सकारात्मक प्रतिसाद देत, दोन्ही जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रे स्थापन करण्यास टाटा टेक्नॉलॉजीने अधिकृत मान्यता दिली आहे.


या ‘सीट्रिपलआय’ सेंटरमुळे स्थानिक युवकांसाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्र (नाशिक) आणि विदर्भ (अमरावती) या दोनही भागातील युवकांना जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण मिळण्याची दारे उघडली जाणार आहेत. सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य, आवश्यक प्रशिक्षण यासारख्या संधी आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होतील. या केंद्रांमुळे स्थानिक पातळीवर उद्योगांना कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होईल, नवउद्योगांना चालना मिळेल आणि स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रांमुळे औद्योगिक क्षेत्राला प्रशिक्षित, कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या समर्थ युवक मिळतील, नवउद्योगांच्या स्थापनेस प्रोत्साहन मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्था आणि उद्योगविकासाला बळकटी मिळेल, तसेच युवकांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल.


राज्यातील युवकांना रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करून ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचा उपक्रम म्हणून या दोन केंद्रांना मोठे महत्त्व आहे. ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रांमधून विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. ‘रोबोटिक्स’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT)’, ‘डेटा ॲनालिटिक्स, ‘इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान’, ‘ऑटोमेशन’ अशा अत्याधुनिक क्षेत्रांत युवकांना प्रशिक्षण मिळेल. उपमुख्यमंत्री पवार यांच्या पुढाकारातून नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांना मिळालेली ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रे ही राज्याच्या औद्योगिक आणि कौशल्य विकास क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरतील. या माध्यमातून ‘कौशल्यसंपन्न महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने राज्याने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.


Comments
Add Comment

न्यूमोनियामुळे श्वसनप्रणाली बंद झाल्याने ‘शक्ती’ वाघाचा मृत्यू

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील

मुंबईत दुबार, तिबार... १०३ बार मतदार

मुंबईत ४ लाख ३३ हजार मतदारांची नावे दुबार नोंद दुबार मतदारांची एकूण संख्या ११ लाख ०१ हजार दुबार मतदारांचा

Smriti Mandhana Palash Muchhal : धोका देणारी व्यक्ती मी नाही, 'मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा दाखवायचा होता'; मेरी डिकॉस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि लोकप्रिय म्युझिक

राणीबागेतील 'शक्ती' वाघाचा संशयास्पद मृत्यू! आठ दिवसांनंतर व्यवस्थापनाने केले उघड, का केली लपवाछपवी?

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेतून एक धक्कादायक

Mumbai Terror Attack : आग, धूर अन् रक्ताने माखलेली ती रात्र... २६/११ च्या भयावह रात्री 'या' ताज कर्मचाऱ्यांमुळे वाचले शेकडो जीव;

मुंबई : आजचा दिवस २६ नोव्हेंबर भारतीय आणि विशेषतः मुंबईच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि वेदनादायी दिवसांपैकी एक

Who Is Mary D'Costa? : कोण Mary D'Costa? लग्नाच्या आदल्या रात्री 'तिच्या'सोबत रंगेहाथ सापडला पलाश मुच्छल? धक्कादायक खुलासे!

भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि लोकप्रिय म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palaash Muchhal) दोघेही