क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी सात वेगवेगळे नियम

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. तर दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian cricket women’s team) २०२५ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाल करत आहे. भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता २ नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.


पण तुम्हाला माहीत आहे का ? पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये ७ महत्त्वाचे नियम वेगळे असतात! चला, जाणून घेऊया या दोन्ही खेळांतील काही प्रमुख फरक


पुरुष क्रिकेटमध्ये कसोटी सामना ५ दिवसांचा असतो, तर महिलांसाठी कसोटी सामना ४ दिवसांचा असतो.


पुरुष कसोटी सामन्यात दररोज किमान ९० षटकांचा खेळ होतो, तर महिला कसोटीमध्ये दररोज किमान १०० षटके टाकणे बंधनकारक असते.


वनडे क्रिकेटमध्येही फरक आहे. पुरुषांच्या सामन्यात तीन ‘पॉवरप्ले’ असतात, तर महिला सामन्यात फक्त एकच ‘पॉवरप्ले’ दिला जातो.


पुरुषांच्या वनडे सामन्यात बाउंड्रीचे अंतर किमान ५९.४३ मीटर आणि जास्तीत जास्त ८२ मीटर असते. महिला सामन्यात हे अंतर किमान ५४.८६ मीटर आणि जास्तीत जास्त ६४ मीटर असते.


दोघांच्या ‘इन-सर्कल’च्या अंतरातही फरक आहे. पुरुष सामन्यात ३० मीटर तर महिला सामन्यात २५ मीटरचे अंतर असते.


चेंडूच्या वजनातही बदल असतो. महिला क्रिकेटमधील चेंडूचे वजन किमान १४२ ग्रॅम असते, तर पुरुष क्रिकेटमध्ये तो किमान १५६ ग्रॅमचा असतो.

Comments
Add Comment

Jasprit Bumrah : बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार ? दुखापतीमुळे निवड समितीसमोर पर्यायांचा प्रश्न

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणाऱ्या

Abhishek Sharma : अभिषेक शर्माचा धूमधडाका, ९१ चेंडूत केल्या एवढ्या धावा की प्रतिस्पर्धी धास्तावले

नवी दिल्ली : अमृतसर विरुद्ध तरन तारन मेन सिनिअर या स्थानिक सामन्यात भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर अभिषेक शर्मा

Hardik Pandya : हार्दिक पांड्यानं घेतला मोठा निर्णय, महिकासोबत घेतलं तिरुपतीच्या बालाजीचं दर्शन

तिरुपती : दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे.

Duleep Trophy 2026 Tilak Varma : तिलक वर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! दुलीप ट्रॉफीत दक्षिण विभागाचे कर्णधारपद; करुण नायरलाही संधी

मुंबई : भारताच्या टी-20 संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा (Tilak Varma) याच्यावर बीसीसीआयने (BCCI) आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. 23

Commonwealth Games 2026 : ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतानं जिंकली ३९ पदकं, समारोप सोहळ्यात दिसेल अहमदाबाद २०३० ची झलक

ग्लासगो : स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरात सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात

Commonwealth Games 2026 : भूसुरुंगाच्या स्फोटात पाय गमावला, पण जिद्द सोडली नाही; बॉक्सर ते सुवर्णपदक विजेता ठरलेला सोमन राणा

ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपल्या प्रेरणादायी प्रवासातून संपूर्ण