मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली; विरोधकांची झाली पंचाईत !

मुंबई : मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी उद्या निवडणूक आयोगाविरोधात “सत्याचा मोर्चा” काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चात अनेक विरोधी नेते सहभागी होणार आहेत


या मोर्चात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, तसेच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मोर्चाची सुरुवात दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटवरून होणार होती. मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा मोर्चा जाणार होता.


मात्र, या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आझाद मैदानाच्या बाहेर मोर्चा काढण्यास नियमांनुसार परवानगी देता येत नाही. आझाद मैदानाच्या आत आंदोलन करता येईल, परंतु बाहेरून मोर्चा निघाल्यास तो विनापरवाना ठरेल. आणि विनापरवाना मोर्चा काढल्यास आंदोलनकर्त्यांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे.


राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेला इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “विनापरवाना मोर्चा काढल्यास नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल.” त्यामुळे विरोधकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा