“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू


नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरेल, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. राज्य सरकारशी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर आज, शुक्रवारी नागपूरला पोहचल्यावर कडू बोलत होते.


यासंदर्भात कडू म्हणाले की, जर सरकारने कालपासूनच कर्जमाफीची घोषणा केली असती, तर ती 31 मार्च 2025 पर्यंतच्या थकीत कर्जावर लागू झाली असती. मात्र आता ही कर्जमाफी 31 मार्च 2026 पर्यंतच्या थकबाकीवर लागू होईल. त्यामुळे यंदाच्या अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असे कडू यांनी सांगितले. सरकारच्या प्रतिनिधींसोबत काल सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत तीव्र चर्चा झाल्याचे कडू यांनी नमूद केले.


सरकार आर्थिक कारणे पुढे करून तारीख देण्यास तयार नव्हते. मात्र आम्ही तारीख घेऊनच आल्याचे कडू यांनी सांगितले. तसेच त्यांनी विश्वास व्यक्त केला की सर्व शेतकऱ्यांची नाही, पण गरीब आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित होईल. कर्जमाफीसाठी सरकारमधील प्रमुख नेत्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे कडू यांनी सांगितले. “एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका आणि आमचे देवा भाऊ यांचे प्रयत्न या सर्वांच्या मेहनतीमुळेच कर्जमाफी शक्य झाली. हा श्रेयाचा नव्हे, तर राजकीय आशीर्वादाचा मुद्दा आहे. अखेरीस श्रेय सरकारलाच मिळणार असल्याचे कडू यांनी सांगितले.


विरोधकांकडून सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या कर्जमाफीचा राजकीय फायदा घेईल, या आरोपांवर कडू यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. आम्ही नामर्दाची अवलाद नाही. जर सरकारने निवडणुकीचा फायदा न घेता कर्जमाफी केली नाही, तर आमच्या हातातला हिरवा रंग लाल होईल. आम्ही सरकारला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्यानंतर कडू भावुक झाले. आज माझी आई असती तर तिचा समाधानी चेहरा पाहायला मिळाला असता. यंदा निवडणुकीचा गुलाल आमच्या हातून गेला असेल, पण आमच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य रंगीत करण्याची संधी आम्हाला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.



Comments
Add Comment

Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या

Pravin Darekar : अभियांत्रिकीच्या 'डिस्टन्स' पदव्या अवैध; तरीही महापालिकेत पदोन्नत्या कशा? आमदार दरेकरांचा सवाल

मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्या १० वर्षांत परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे देण्यात

NCMC Smart Card : एसटीच्या 'NCMC स्मार्ट कार्ड'ला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; आठवड्याभरातच १ लाखाचा टप्पा पार!

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’