सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात अश्रू होते. हे अश्रू आनंदाचे होते, विश्वासाचे होते आणि स्वप्ने प्रत्यक्षात उतरल्याचे होते. ३३९ धावांचा डोंगर गाठण्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानावर उतरला, तेव्हा चाहत्यांना कुठेतरी वाटत होते की, ऑस्ट्रेलियासारख्या संघासमोर कदाचित हे अशक्य आहे. पण, एका बाजूला उभी असलेल्या जेमिमाला मात्र हे शक्य वाटत होते. दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत राहिल्या, पण जेमिमाचा आत्मविश्वास वाढत राहिला.


जेमिमाने शतक पूर्ण केल्यानंतरही तिने कोणताही आनंद व्यक्त केला नाही, कारण तिला माहीत होते की या शतकापेक्षा भारताचा विजय महत्त्वाचा आहे. देशाचा विजय, जो संघाला फायनलमध्ये घेऊन जाईल. झालेही तसेच. जेमिमा शेवटपर्यंत क्रीझवर टिकून राहिली. तिने संयमही दाखवला आणि जोशही. अखेरीस १२७ धावांची नाबाद खेळी करून फायनलचे तिकीट मिळवलेच.



विजयानंतर जेमिमा झाली भावूक


सामन्यादरम्यान जेव्हा कॅमेरा जेमिमाकडे गेला, तेव्हा ती काहीतरी पुटपुटताना ऐकू आली. ती वरच्या देवाकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होती. सामना संपल्यावर जेव्हा स्टेडियम भारत आणि जेमिमाच्या घोषणेने निनादले, तेव्हा जेमिमाच्या डोळ्यांतून अश्रू ओसंडून वाहिले.


 


विजयानंतर काय म्हणाली जेमिमा


सामना जिंकल्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब स्वीकारताना जेमिमा म्हणाली, 'मी येशूचे आभार मानू इच्छिते, कारण मी हे माझ्या बळावर करू शकले नसते. मी माझ्या आई, वडील, प्रशिक्षक आणि या संपूर्ण काळात ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते.' ती म्हणाली की, माझे बस एकच लक्ष्य होते. भारताला हा सामना जिंकवून देणे, कारण आम्ही अनेकदा अशा परिस्थितीत हार पत्करली होती.



शतकावर काय म्हणाली जेमिमा


जेमिमा म्हणाली की, आजचा दिवस माझ्या ५० किंवा १०० धावांबद्दल नव्हता. आजचा दिवस भारताला जिंकवून देण्याबद्दल होता. मला माहीत आहे की मला काही संधींवर नशिबाची साथ मिळाली, पण मला वाटते की देवाने सर्वकाही योग्य वेळी दिले.



बायबलमधील ओळी पुन्हा पुन्हा म्हणत होती...


जेमिमा म्हणाली की, सुरुवातीला मी फक्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते आणि स्वतःशी बोलत होते. पण शेवटी, मी... मी बायबलमधील एक ओळ पुन्हा पुन्हा म्हणत होते, कारण माझी ऊर्जा संपली होती, मी खूप थकून गेले होते. ती ओळ होती, 'फक्त स्थिर राहा, देव तुमच्यासाठी लढेल...' मी फक्त उभी राहिले. आणि त्यांनी (देवाने) माझ्यासाठी लढाई केली.

Comments
Add Comment

Ind vs ZIM : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स

IPL 2026 : तेवतियाच्या बॅटवर पंचांचा आक्षेप! ऐन सामन्यातच बदलावी लागली बॅट

मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त

IPL 2026 : पदार्पणाच्या सामन्यातच कॉनॉलीचा ‘वन-मॅन शो’; पंजाबचा गुजरातवर ३ विकेट्स राखून विजय

आयपीएल २०२६ ची दमदार सुरुवात करत पंजाब किंग्सने न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून