सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात अश्रू होते. हे अश्रू आनंदाचे होते, विश्वासाचे होते आणि स्वप्ने प्रत्यक्षात उतरल्याचे होते. ३३९ धावांचा डोंगर गाठण्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानावर उतरला, तेव्हा चाहत्यांना कुठेतरी वाटत होते की, ऑस्ट्रेलियासारख्या संघासमोर कदाचित हे अशक्य आहे. पण, एका बाजूला उभी असलेल्या जेमिमाला मात्र हे शक्य वाटत होते. दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत राहिल्या, पण जेमिमाचा आत्मविश्वास वाढत राहिला.


जेमिमाने शतक पूर्ण केल्यानंतरही तिने कोणताही आनंद व्यक्त केला नाही, कारण तिला माहीत होते की या शतकापेक्षा भारताचा विजय महत्त्वाचा आहे. देशाचा विजय, जो संघाला फायनलमध्ये घेऊन जाईल. झालेही तसेच. जेमिमा शेवटपर्यंत क्रीझवर टिकून राहिली. तिने संयमही दाखवला आणि जोशही. अखेरीस १२७ धावांची नाबाद खेळी करून फायनलचे तिकीट मिळवलेच.



विजयानंतर जेमिमा झाली भावूक


सामन्यादरम्यान जेव्हा कॅमेरा जेमिमाकडे गेला, तेव्हा ती काहीतरी पुटपुटताना ऐकू आली. ती वरच्या देवाकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होती. सामना संपल्यावर जेव्हा स्टेडियम भारत आणि जेमिमाच्या घोषणेने निनादले, तेव्हा जेमिमाच्या डोळ्यांतून अश्रू ओसंडून वाहिले.


 


विजयानंतर काय म्हणाली जेमिमा


सामना जिंकल्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब स्वीकारताना जेमिमा म्हणाली, 'मी येशूचे आभार मानू इच्छिते, कारण मी हे माझ्या बळावर करू शकले नसते. मी माझ्या आई, वडील, प्रशिक्षक आणि या संपूर्ण काळात ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते.' ती म्हणाली की, माझे बस एकच लक्ष्य होते. भारताला हा सामना जिंकवून देणे, कारण आम्ही अनेकदा अशा परिस्थितीत हार पत्करली होती.



शतकावर काय म्हणाली जेमिमा


जेमिमा म्हणाली की, आजचा दिवस माझ्या ५० किंवा १०० धावांबद्दल नव्हता. आजचा दिवस भारताला जिंकवून देण्याबद्दल होता. मला माहीत आहे की मला काही संधींवर नशिबाची साथ मिळाली, पण मला वाटते की देवाने सर्वकाही योग्य वेळी दिले.



बायबलमधील ओळी पुन्हा पुन्हा म्हणत होती...


जेमिमा म्हणाली की, सुरुवातीला मी फक्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते आणि स्वतःशी बोलत होते. पण शेवटी, मी... मी बायबलमधील एक ओळ पुन्हा पुन्हा म्हणत होते, कारण माझी ऊर्जा संपली होती, मी खूप थकून गेले होते. ती ओळ होती, 'फक्त स्थिर राहा, देव तुमच्यासाठी लढेल...' मी फक्त उभी राहिले. आणि त्यांनी (देवाने) माझ्यासाठी लढाई केली.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय

Ishan Kishan : सामन्याच्या आधी इशान किशनवर दुःखाचा डोंगर; इशानने विजयाचं श्रेय दिलं या व्यक्तीला

मुंबई : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत