अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी म्हणून यावर मुंबई महापालिकेने एक उपाय शोधून काढलाय. पावसाळ्यात दरवर्षी मुंबई मधील अंधेरीतील सबवे जलमय होतो आणि वाहतूक विस्कळीत होते यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.


अंधेरी सबवेला लागूनच मोगरा नाला वाहतो. उगम स्थळापासून ते सुमारे अडीच किलोमीटर अंतरात हा नाला वाहतो. विशेष म्हणजे या नाल्याचा प्रवाह उगम स्थळापासून अंधेरी साबवयकडे येताना तब्ब्ल १३ किलोमीटरचा उतार आहे. यामुळे नाल्यातील पाणी वेगाने वाहते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढली की मोगरा नाल्यातून पाणी वेगाने वाहू लागते. यामुळे अंधेरीतला सगळा सखल भाग पाण्याखाली जातो. अंधेरी सबवे, दाऊद बाग, आझाद नगर या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते.


पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा मार्ग


पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा अंधेरी सबवे अंधेरी स्थानकाच्या जवळ आहे. गोखले पुलालगतचा हा मार्ग रेल्वे रूळाच्या खालून जातो.


अंधेरी सबवेवरूनच उड्डाणपूल


एकीकडे अंधेरी सबवे जलमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, अंधेरी सबवेवरूनच उड्डाणपूल उभारणी करण्याचा पर्याय महापालिका पूल विभागाने निवडला आहे. वॉर्ड स्तरावरही याचे नियोजन करण्यात येणार आहे . सबवेवरून पूल होऊ शकतो का, त्याची लांबी किती असावी, त्याचे बांधकाम करताना येणाऱ्या अडचणी, खर्च, पुलाचा फायदा, रेल्वे प्रशासनासह विविध परवानगी याचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यावर चर्चा सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत 15 दिवसांत अहवाल सादर करा

 मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गोपाळगड

Mumbai Crime: मुंबईत खळबळ! RTO कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ACB च्या जाळ्यात; 4 हजारांची लाच घेताना अटक

Crime News: सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील वांद्रे प्रादेशिक

अमृता फडणवीसांनी चालवली गुलाबी ई-रिक्षा; महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक वाहतुकीला

वसई-विरारकरांसाठी मोठी खुशखबर! मेट्रो १३ मार्गिकेचा नवा आराखडा तयार, प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रो (Metro) नेटवर्कचा विस्तार

विश्वासात घेतलं, घरात प्रवेश मिळवला अन् 25 लाखांचा डल्ला! अभिनेत्री रवीना टंडनच्या कुटुंबाला मोठा धक्का

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबाचा विश्वास

BMC News : वरळीतील कोस्टल रोडवरील लोटस जेट्टी ते समुद्र महालपर्यंत नवीन विहारपथ

- ‘मिसिंग लिंक’ पूर्ण करण्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या