महापालिकेच्या शीव रुग्णालयात अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुविधा क्षमतेत ४०० टक्क्यांनी वाढ

तब्बल १२० प्रत्यारोपण केले जाणार


मुंबई (खास प्रतिनिधी) : शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या बालरोग विभागातील बालरोगीय रक्तविज्ञान व कर्करोग शाखेत अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. सध्या या रुग्णालयात दरवर्षी सुमारे २० अस्थिमज्जा प्रत्यारोपण केले जातात. मात्र, आगामी काळात ही संख्या सहा पटीने वाढून तब्बल १२० प्रत्यारोपणांपर्यंत पोहोचणार असून, म्हणजेच प्रत्यारोपण क्षमतेत ४०० टक्क्यांची अभूतपूर्व वाढ होणार आहे. या विस्तारामुळे थॅलेसेमिया, सिकलसेल आजार, ल्यूकेमिया आणि अ‍ॅप्लास्टिक अ‍ॅनिमिया यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर, अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या उपचारांची संधी उपलब्ध होईल.जे उपचार आतापर्यंत अनेक कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या अशक्य होते, ते आवाक्‍यात येतील.


महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आणि अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा तसेच ,उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली आरोग्‍य विभागामार्फत विविध सेवा सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून शीव रुग्णालयाच्या बालरोग विभागात विविध अत्याधुनिक उपचार सुविधा आणि विशेष विभागांची उभारणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बालरोगीय रक्तविज्ञान व कर्करोग शाखेत अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला जात आहे. यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त बालरुग्णांना अत्याधुनिक आणि सुलभ उपचार उपलब्ध होणार आहेत.


लोकनेते एकनाथराव गायकवाड अर्बन हेल्थ सेंटर येथे अत्याधुनिक अस्थिमज्जा प्रत्यारोपण विभाग उभारण्यात येत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार आहे. जानेवारी २०२६ पासून रुग्णांना उपचारासाठी प्रवेश दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मानकांनुसार सुसज्ज असलेल्या या केंद्रात आधुनिक वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक उपकरणे आणि उच्च जोखमीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र संरक्षणयुक्त वॉर्ड उपलब्ध असणार आहे. यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित, प्रभावी आणि परवडणारा उपचाराचा नवा अध्याय सुरू होईल.



या प्रकल्पाच्या यशस्वी उभारणीसाठी ‘वेहा फाउंडेशन’चे सहकार्य लाभले आहे. या संस्थेने १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत ही सुविधा उभारली आहे. पुढील दहा वर्षांपर्यंत केंद्राच्या संचालनाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले, अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवांचा विस्तार हा लोकमान्य टिळक रुग्णालयासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. या उपक्रमामुळे हे रुग्णालय भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील अत्याधुनिक रक्तविज्ञान व कर्करोग उपचार क्षेत्रातील अग्रणी संस्था म्हणून उदयास येत आहे. मुंबईतील वंचित, दुर्बल आणि गरजू रुग्णांना उत्कृष्ट व सुलभ वैद्यकीय सेवा पुरवणे हेच आमचे ध्येय आहे. वेहा फाउंडेशनच्या सहकार्यामुळे आम्ही आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या नव्या युगाची सुरुवात करत आहोत,असे डॉ जोशी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले