फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीने मोबाईलवर फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका क्रूर पतीने तिला अमानुष मारहाण करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला त्याच्या वडिलांसह अटक केली आहे.



मोबाईलवर 'फेसबुक' पाहणे ठरले जीवावर


ही घटना बिदुपूर पोलीस स्टेशन परिसरातील एराजी कंचनपुर गावात घडली. मृत महिलेचे नाव दिव्या कुमारी (वय २७) असून, तिचा पती अभिषेक कुमार उर्फ राजा याने तिची हत्या केली.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दिव्या कुमारी पती अभिषेक कुमार याच्यासमोर मोबाईल फोनवर फेसबुक पाहण्यात व्यस्त होती. सतत मोबाईलवर फेसबुक पाहणे अभिषेकला आवडले नाही आणि तो या गोष्टीवरून अत्यंत क्रोधित झाला. या क्षुल्लक वादातून पतीने दिव्याला अतिशय क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. यात कुटुंबातील इतर सदस्यांनीही आरोपीला साथ दिल्याची माहिती आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दिव्याचा जागीच मृत्यू झाला.


पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर अभिषेक कुमार उर्फ राजा फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मृत दिव्याच्या आईने पोलिसांना सांगितले की, दिव्याचे लग्न २०१६ मध्ये झाले होते आणि लग्नापासूनच तिचा पती तिला वारंवार मारहाण करत असे. गुरुवारी सकाळी सासरचे लोक दिव्याची हत्या करून फरार झाले होते. बिदुपूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी पती अभिषेक कुमार उर्फ राजा याला आणि त्याचे वडील रामाशीष राय यांना अटक केली आहे.


घटनेच्या संदर्भात अधिक तपासणी सुरू असून, सोशल मीडियासारख्या सामान्य गोष्टीवरून एका महिलेचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मोबाईल आणि फेसबुकच्या वापरावरून होणारे कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन हत्या होण्याचे हे गंभीर उदाहरण आहे.

Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन