धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा


मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे काही कर्मचारी दारूच्या नशेत काम करताना आढळले. प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अशा कृत्यांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (गुरुवारी) स्पष्ट केले.


मंत्री सरनाईक यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर, त्यांनी तातडीने सुरक्षा आणि दक्षता विभागाला नशेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मोठे अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, एसटी महामंडळाने मंगळवारी राज्यभरातील सर्व विभागांमध्ये अचानक व्यापक तपासणी मोहीम राबवली.


या अचानक तपासणीत ७१९ चालक, ५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिकी कर्मचाऱ्यांसह एकूण १७०१ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. अखेरीस, कर्तव्यावर दारूचे सेवन केल्याप्रकरणी एकूण सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धुळे (१ यांत्रिकी, १ क्लिनर, १ चालक), नाशिक (१ चालक), परभणी (१ यांत्रिकी), भंडारा (१ यांत्रिकी) आणि नांदेड (१ वाहक) येथील कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.


मंत्री सरनाईक यांनी इशारा दिला आहे की, भविष्यात असे गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि यापुढेही अचानक तपासण्या सुरू राहतील. तसेच, भविष्यात येणाऱ्या नवीन एसटी बसेसमध्ये चालकांच्या सीटजवळ श्वास विश्लेषक उपकरणे बसवण्यात येतील, ज्यामुळे दारू पिऊन गाडी चालवण्यास प्रतिबंध होईल.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून