कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून केवळ अनधिकृत झोपड्यांनी अडवून ठेवले होते. अखेर अंधेरी पश्चिम येथील एस व्ही पटेल रोडवरील अनधिकृत झोपड्यांवर जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या जोड2 रस्त्याचे काम पुढील दोन वर्षांमध्ये होईल आणि यामुळे लोखंडवाला आणि सात बंगला परिसरात जाणाऱ्या लोकांचा प्रवास सुकर होईल तसेच सध्या जे.पी. रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या कायमचीच निकालात निघेल.


अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर परिसरातील विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामात तब्बल ४७ झोपड्या तसेच इतार बांधकामे अडथळा येत होती. ही बांधकाम सीआरझेड जागेत येत होती आणि ही जागा जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित येत आहे. मात्र,या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात न आल्याने या जोड रस्त्याचे काम मागील दीड वर्षांपासून अडकून पडले होते.


मात्र,आता महापालिकेच्यावतीने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाने महापालिकेच्या मदतीने या सर्व बांधकामावर गुरुवारी धडक कारवाई केली. ही बाधकामे हटवण्यात आल्याने या जोड रस्त्याच्या कामांना गती मिळणार असून आता या जोड रस्त्याचे काम पुढील दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सरदार वल्लभभाई पटेल नगरमधून विकास नियोजित रस्ता जात असून हा रस्ता आता अतिरक्त जोड रस्ता ठरणार आहे.

Comments
Add Comment

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक