महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे ‘बिग बॉस१९’च्या घराचा नवा कॅप्टन !

मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो मध्ये महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे देखील सहभागी आहे. सुरुवातीच्या काळात प्रणीतला खेळाची गती समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागला. पण आता प्रणितने आपलं स्थान पक्कं केलं आहे. कधी हसवणारा,कधी भिडणारा प्रणित आता घरातल्या इतर सदस्यांवर आपला प्रभाव दाखवत आहे. त्याच्या खेळातील बदल आणि रणनीती पाहून प्रेक्षकही उत्सुकतेत आहेत. अशातच या आठवड्यातील घडामोडीनंतर प्रणित ‘बिग बॉस १९’च्या घराचा नवा कॅप्टन’ बनला आहे.


या आठवड्यात घरात झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये बिग बॉसने घरातील सदस्यांना जोड्यांमध्ये विभागलं होतं. या जोड्या कुनिका-नीलम, तान्या-मृदुल, प्रणित-शहबाज, गौरव-मालती आणि अमल-फरहाना अशा होत्या. मात्र, अभिषेक आणि अशनूर यांनी नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांना या आठवड्यातील स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं. टास्कमध्ये घरातील वस्तू गोळा करण्याचं काम देण्यात आलं होतं, आणि ज्या जोडीने सर्वाधिक वस्तू जमा केल्या ती कॅप्टन्सीसाठी पात्र ठरणार होती. टास्कमध्ये टाय झाल्यानंतर घरातील सदस्यांच्या मतदानावरून प्रणित आणि शहबाज या जोडीला कॅप्टन्सी टास्कसाठी निवडण्यात आलं.


यानंतर दोघांमध्ये आणखी एक निर्णायक फेरी झाली, ज्यात अशनूर, अभिषेक, गौरव आणि मालती यांच्या पाठिंब्याने प्रणितने विजय मिळवला आणि तो घराचा नवा कॅप्टन ठरला.


“बिग बॉस तक”च्या माहितीनुसार, या कॅप्टन्सी टास्कला ‘मिस्टिरियस सायंटिस्ट लॅब’ असं नाव देण्यात आलं होतं. प्रत्येक फेरीत ‘शास्त्रज्ञ’ काही विशिष्ट वस्तू मागत होता आणि घरातील जोड्या त्या वस्तू पुरवत होत्या. ज्यांच्या हाती सर्वाधिक डिलिव्हरी गेल्या, ती जोडी त्या फेरीची विजेती ठरत होती.



टास्कमधील जोड्या आणि विजेते


पहिल्या फेरीत टेडी बेअर्स गोळा करण्याचं काम होतं — विजेते शहबाज आणि प्रणित.


दुसऱ्या फेरीत लाकडी हत्ती गोळा करायचे होते — अमल आणि फरहाना विजेते.


तिसऱ्या फेरीत हेल्मेट गोळा करायचे होते — नीलम आणि कुनिका विजेत्या.


चौथ्या फेरीत टॉवेल गोळा करायचे होते — गौरव आणि मालती विजेते.


पाचव्या फेरीत लाकडी काठ्या गोळा करायच्या होत्या — पुन्हा अमल आणि फरहाना विजेते.


सहाव्या फेरीत चमचे गोळा करायचे होते — मृदुल आणि तान्या विजेत्या.


सातव्या फेरीत उशा गोळा करायच्या होत्या — गौरव आणि मालती विजेते.


फेऱ्या संपल्यानंतर सामना बरोबरीत राहिल्याने सर्व सदस्यांना व्होटिंगसाठी बोलावण्यात आलं. व्होटिंगचा निकाल शहबाज-प्रणित जोडीला ५ मते, तर गौरव-मालती जोडीला ३ मते असा लागला. त्यामुळे प्रणित-शहबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.


अंतिम कॅप्टन्सी टास्कचं नाव होतं ‘गनशॉट’. या फेरीत स्लाईडवरून तीन बॉल पडत होते, पण त्यापैकी फक्त एका बॉलवर नंबर लिहिलेला होता. जो कोणी तो नंबर असलेला बॉल पकडेल, त्याला तीन पर्याय दिले जात होते तो बॉल प्रणितला द्यायचा, शहबाजला द्यायचा किंवा रेशन बोर्डवर ठेवायचा. शेवटी बोर्डवर सर्वाधिक एकूण नंबर असणारा स्पर्धक कॅप्टन ठरवला जाणार होता.


अभिषेक, अशनूर, गौरव आणि मालती यांच्या मदतीने प्रणितने शेवटी विजय मिळवला आणि तो ‘बिग बॉस’च्या घराचा नवा कॅप्टन बनला.
मराठमोळा प्रणित कॅप्टन झाल्याने आता प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये आणखी धमाल आणि स्पर्धात्मक वातावरण पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट