मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक म्हणजे 1.57 लाख नवीन ग्राहकांची भर घातली आहे. तर एअरटेलने 52 हजार 255, वोडाफोन-आयडियाने 50 हजार 504, आणि बीएसएनएलने 34 हजार 610 नवीन ग्राहक जोडले असल्याची माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे.

जिओने मागील तीन महिन्यांपासून आपल्या ग्राहकसंख्येत सातत्याने वाढ नोंदवली आहे. उच्च गतीचे इंटरनेट, स्वस्त प्लॅन आणि विस्तारित कव्हरेजमुळे ग्रामीण भागातदेखील जिओची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. एअर फायबर सेवांनाही वाढता प्रतिसाद:

ट्रायच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील सक्रिय जिओ एअर फायबर वापरकर्त्यांची संख्या 5,52,265 इतकी झाली आहे. तुलनेत एअरटेलचे सक्रिय फायबर ग्राहक 2,00,813 इतके आहेत. जलद इंटरनेट स्पीड, ऑनलाईन शिक्षण आणि घरून काम (Work From Home) संस्कृतीमुळे या सेवेची मागणी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्र हे दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य राज्य ठरत असून, डिजिटल पायाभूत सुविधा वाढविण्यात खाजगी कंपन्यांचा मोठा वाटा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कोणतीही चूक, निष्काळजीपणा किंवा नियमभंग सहन करणार नाही महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आचारसंहितेच्‍या कालावधीत प्रत्येक कृतीची नियमांनुसार अचूक व वेळेत नोंद घेणे बंधनकारक

BMC Election 2026 : वांद्रेत मनसेला खिंडार! 'मशाली'ला विरोध करत निष्ठावंतांचा भाजपमध्ये प्रवेश; ११ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

मुंबई : निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष शर्थीचे प्रयत्न करत

Mumbai Crime... मुंबईत खळबळ! न्यू इअर पार्टी साठी घरी बोलावून, गर्लफ्रेंडने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टलाच...

मुंबई : मुंबईत नववर्षाच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. सांताक्रूझ पूर्व येथील कालिना परिसरात एका महिलेने

UTA APP... UTS अॅपला रामराम! मुंबई लोकल प्रवाशांसाठी 'हे' नवे ॲप, एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व रेल्वे सेवा

मुंबई : दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच

भाजपाच्या ८३ पैंकी ५४ माजी नगरसेवकांना दिली पुन्हा संधी

केवळ २७ माजी नगरसेवकांना नाकारले तिकीट मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने

कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणांतर्गत मुंबईत प्रथमच जागतिक शिखर संमेलन

बीकेसी जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे २२ व २३ फेब्रुवारी रोजी जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या,