पवईत शूटिंगच्या बहाण्याने २५ मुलांना खोलीत डांबले, अखेर सुरक्षा पथकाने केला गोळीबार

मुंबई : मुंबईतल्या पवई परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शूटिंगच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑडिशनच्या ठिकाणी एका व्यक्तीने अचानक अनेक मुलांना ओलीस ठेवत व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, २५ मुला-मुलींना त्याने बंदी बनवले असून पोलिस आणि एनएसजी कमांडो घटनास्थळी दाखल झाले आहेत.


सदर आरोपीचं नाव रोहित आर्य असं असून त्याने आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे की, “मी दहशतवादी नाही. माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी मुलांना ओलीस ठेवलं आहे, कारण मला काही लोकांशी संवाद साधायचा आहे.”


रोहित आर्यने पुढे म्हटलं की, “मी पैशांची मागणी केलेली नाही. माझं उपोषण १ मेपासून सुरू आहे. अनेकांकडे गेलो, अनेक वेळा प्रयत्न केले, पण माझ्या प्रश्नांकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्यामुळे आज मी तीव्र उपोषण सुरू केलं आहे. आता मी पाणी सुद्धा घेणार नाही. सरकार आणि संबंधित लोकांनी या प्रश्नाचं गांभीर्य ओळखावं, नाहीतर पुढचं पाऊल काय असेल हे सांगू शकत नाही.” त्याने पुढे सांगितले की, “हा प्रश्न फक्त माझा नाही, अनेक लोकांचा आहे. मला समाधानकारक उत्तर आणि संवाद हवा आहे.” सध्या पोलिस, अग्निशमन दल आणि एनएसजी कमांडोनी परिसराला वेढा दिला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अखेरच्या वृत्तानुसार सुरक्षा पथकाने गोळीबार केला. या गोळीबारात मुलांना डांबून ठेवणारा जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्यावरून भाजपा नगरसेविकेने घेतला विरोधकांचा समाचार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्यावरून भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी विरोधकांचा चांगलाच

Nashik Simhastha 2027 : कुंभ २०२७साठी एआयची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा, जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित

Assembly Election : बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

पुणे : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ पैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०