‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार


नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात नागपुरात सुरू असलेल्या आंदोलनात आज, बुधवारी रात्री मोठी घडामोड घडली. शासनाच्या प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर रात्री 9.30 वाजता कडू यांनी आंदोलन कायम ठेऊन मुंबईत गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चेची तयारी दाखवली आहे.

नागपुरात बच्चू कडू, राजू शेट्टी, कॉ. अजित नवले, महादेव जानकर आणि इतर शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी मंगळवारी नागपूर- हैदराबाद महामार्ग 44 रोखून धरल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. याप्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून (सुमोटो-कॉग्निजन्स) दखल घेत बुधवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रस्ता मोकळा करून गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करत कॉटन फेडरेशनच्या शेजारी असलेल्या मैदानावर ठिय्या मांडला. याठिकाणी संध्याकाळी 6 वाजता बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल दाखल झाले. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आलो आहे. सरकार आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघेल, आपण वेळ द्यावी, चर्चेतून मार्ग निघेल. यावर बच्चू कडू यांनी दोन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांशी बोला आणि फोन लावा आणि कर्जमुक्तीबाबत हो आहे की नाही याबाबत विचारा असे सांगितले. तसेच आम्ही शांत बसलो की सरकार शांत होते. आम्ही जेलभरो करायला लागलो की तुम्ही लगेच आलात. आम्ही 4 वाजता तुम्ही येणार यासाठी वाट पाहिली. सहा वाजता कोर्टाचा आदेश आला तुम्ही यायला हवे होते, आम्ही जेलभरो करायला गेलो तुम्ही आलात, असे बच्चू कडू म्हणाले.

यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारनं केलेल्या विनंतीप्रमाणं बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील. या काळात आंदोलन शांततेत सुरु राहिल्यास कुठलाही त्रास प्रशासनाकडून होणार नाही, असे पंकज भोयर म्हणाले. तर, बच्चू कडू यांनी आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. जर तोडगा निघाला नाही किंवा आम्हाला चुना लावण्याचा प्रयत्न केला, तर आल्यानंतर थेट रेल रोको करणार असा इशारा बच्चू कडूंनी दिला.

Comments
Add Comment

आता… ‘गाव तिथे एसटी’ नव्हे... ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी’! - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता

Mumbai-Nashik Local Train: मुंबई-नाशिक लोकलसेवा सुरु होणार; रेल्वे मार्गाच्या विस्ताराला मंजुरी

मुंबई: मुंबई आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. मुंबईच्या

Pune: पुण्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या बाबू भैय्याचं पितळ उघड

पुणे: पुण्याच्या गजबजलेल्या बुधवार पेठेत गेल्या २० वर्षांपासून बाबू भैय्या हे नाव अत्यंत दबदब्यानं घेतलं जातं.

Sharad Pawar: शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; रुबी रुग्णालयात दाखल

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची प्रकृती खालावल्याचे समोर येत आहे.

Mumbai-Pune Expressway : ३२ तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मिळणार रिफंड; जाणून घ्या रिफंड कसा मिळवाल ?

मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमधल्या वाहतुकीचा वेग वाढावा म्हणून नव्वदच्या दशकात मुंबई-पुणे

Chhatrapati Sambhajinagar Police Recruitment: धक्कादायक! पोलीस भरतीदरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू

मुंबई: पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू