'द ताज स्टोरी' वादात! हायकोर्टाचा तातडीच्या सुनावणीस नकार; काय आहे नेमकं प्रकरण?

नवी दिल्ली : अभिनेते परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट 'द ताज स्टोरी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या आशयामुळे आणि त्याला सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या प्रमाणपत्राविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर (PIL) तातडीने सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, मात्र ट्रेलर रिलीज होताच या वादाला तोंड फुटले आहे.



नेमकी याचिका कशासाठी?


'द ताज स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालावी आणि सेन्सॉर बोर्डाने (CBFC) दिलेले प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी करणारी ही जनहित याचिका होती. यासंदर्भात त्वरित सुनावणी व्हावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने या केसमध्ये तातडीने सुनावणी करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, ही याचिका त्वरित सुनावणीसाठी यादीत (लिस्टमधील) समाविष्ट केली जाणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला.



इतिहासाची चुकीची मांडणी केल्याचा आरोप


वकील शकील अब्दुल्ला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, चित्रपटात इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. ज्यामुळे समाजात आणि दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाच्या संभाव्य वाईट परिणामांची कल्पना असूनही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे.



याचिकाकर्त्यांची मागणी काय?


याचिकाकर्त्याने सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाच्या प्रमाणपत्राची पुन्हा एकदा समीक्षा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. गरज पडल्यास चित्रपटाला 'अडल्ट सर्टिफिकेट' द्यावे किंवा काही आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याचा आदेश द्यावा. तसेच, चित्रपटात ही कथा काल्पनिक असून ऐतिहासिक तथ्यांवर आधारित असल्याचा दावा करत नाही, असा 'डिस्क्लेमर' (अस्वीकरण) जोडण्याची सूचनाही याचिकेत केली आहे.



चित्रपटाची स्टारकास्ट आणि प्रदर्शनाची तारीख


या चित्रपटाचा ट्रेलर १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर लगेचच यावर वाद सुरू झाला. 'द ताज स्टोरी' या चित्रपटात परेश रावल यांच्यासोबत झकीर हुसेन, अमृता खानविलकर, स्नेहा वाघ आणि नमित दास यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. सी.ए. सुरेश झा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर तुषार अमरीश गोयल यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.


हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता चित्रपट निर्धारित वेळेत प्रदर्शित होतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी

Major Diplomatic Twist India-Nepal Meeting : नेपाळचा भारताकडे स्पष्ट कल! दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीनंतर चीनची चिंता वाढली

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये शनिवारी भारत आणि नेपाळ यांच्यात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक