टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर टोमॅटोचा रस प्यायल्याने होणारे कमालीचे बदल सांगितले तर मात्र तुम्ही आजपासूनच टोमॅटोचा रस प्यायला सुरूवात कराल. कारण आपल्या स्वयंपाकघरात रोज दिसणारा टोमॅटो, केवळ भाजीतला रंग बदलत नाही तर आरोग्याचा रंगही बदलू शकतो.


टोमॅटो हा एक नैसर्गिक औषधाचा खजिना आहे. त्यामुळे टॉमेटोचा रस रोज प्यालात तर तुम्हाला रोजच्या जीवनात अनेक महत्त्वाचे फायदे होऊ शकतात. टोमॅटोमुळे होणारा पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे टोमॅटोमध्ये असलेले घटक ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ कमी करून ‘गुड कोलेस्ट्रॉल’ वाढवतात. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारून हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होते. दुसरं म्हणजे दररोज टोमॅटोचा रस प्यायल्याने किडनी आणि मूत्रसंस्था स्वच्छ राहते. यामुळे युरिनच्या समस्यांना पुर्णविराम मिळतो. तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.



तिसरं म्हणजे टोमॅटोमध्ये मुबलक ‘व्हिटॅमिन के’ असतं. त्यामुळे हाडे मजबूत होतात. टॉमेटोच्या रसामुळे वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर महिनाभर टॉमेटोचा रस प्या. जे लोक फिटनेसकडे लक्ष देतात, त्यांच्यासाठी तर टोमॅटोचा रस नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे. शरीराप्रमाणेच त्वचेलाही टोमॅटोचा फायदा होतो. टोमॅटोतील लाइकोपीन हे अँटिऑक्सिडंट त्वचेवरील डाग कमी करतात आणि सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण करतात. त्यामुळे टोमॅटोमुळे चेहऱ्यावरचा ग्लो वाढतो!


आता तुम्हाला टोमॅटोचा रस कसा करावा असा प्रश्न पडला असेल?



टोमॅटोचा रस करण्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुवा, कापा आणि मिक्सरमध्ये वाटा. त्यात थोडं मीठ, काळी मिरी, आलं आणि लिंबाचा रस मिसळा. अशाप्रकारे तुम्ही रोज टोमॅटोचा रस प्यायलात तर नक्कीच शरीराला महत्त्वाचे फायदे होतील.

Comments
Add Comment

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे