टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर टोमॅटोचा रस प्यायल्याने होणारे कमालीचे बदल सांगितले तर मात्र तुम्ही आजपासूनच टोमॅटोचा रस प्यायला सुरूवात कराल. कारण आपल्या स्वयंपाकघरात रोज दिसणारा टोमॅटो, केवळ भाजीतला रंग बदलत नाही तर आरोग्याचा रंगही बदलू शकतो.


टोमॅटो हा एक नैसर्गिक औषधाचा खजिना आहे. त्यामुळे टॉमेटोचा रस रोज प्यालात तर तुम्हाला रोजच्या जीवनात अनेक महत्त्वाचे फायदे होऊ शकतात. टोमॅटोमुळे होणारा पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे टोमॅटोमध्ये असलेले घटक ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ कमी करून ‘गुड कोलेस्ट्रॉल’ वाढवतात. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारून हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होते. दुसरं म्हणजे दररोज टोमॅटोचा रस प्यायल्याने किडनी आणि मूत्रसंस्था स्वच्छ राहते. यामुळे युरिनच्या समस्यांना पुर्णविराम मिळतो. तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.



तिसरं म्हणजे टोमॅटोमध्ये मुबलक ‘व्हिटॅमिन के’ असतं. त्यामुळे हाडे मजबूत होतात. टॉमेटोच्या रसामुळे वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर महिनाभर टॉमेटोचा रस प्या. जे लोक फिटनेसकडे लक्ष देतात, त्यांच्यासाठी तर टोमॅटोचा रस नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे. शरीराप्रमाणेच त्वचेलाही टोमॅटोचा फायदा होतो. टोमॅटोतील लाइकोपीन हे अँटिऑक्सिडंट त्वचेवरील डाग कमी करतात आणि सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण करतात. त्यामुळे टोमॅटोमुळे चेहऱ्यावरचा ग्लो वाढतो!


आता तुम्हाला टोमॅटोचा रस कसा करावा असा प्रश्न पडला असेल?



टोमॅटोचा रस करण्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुवा, कापा आणि मिक्सरमध्ये वाटा. त्यात थोडं मीठ, काळी मिरी, आलं आणि लिंबाचा रस मिसळा. अशाप्रकारे तुम्ही रोज टोमॅटोचा रस प्यायलात तर नक्कीच शरीराला महत्त्वाचे फायदे होतील.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी