हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा क्रिकेटविश्वात रंगली आहे. आणि या खेळाडूच्या परतीमुळे परिणामी गंभीरला आपल्या आवडत्या खेळाडूला संघाबाहेर ठेवावं लागू शकतं.


रोहित आणि विराटनंतर आता भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आहे. शमी सध्या बंगाल संघाकडून रणजी ट्रॉफी खेळत आहे आणि त्यानं आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. शमीने अलीकडे दोन रणजी सामन्यांत शानदार कामगिरी करत एकूण १५ बळी घेतले आहेत. पहिल्या सामन्यात ७ आणि दुसऱ्या सामन्यात तब्बल ८ विकेट्स. त्याच्या या फॉर्ममुळे आता तो पुन्हा राष्ट्रीय संघात निवडला जाऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.


गौतम गंभीर सध्या भारतीय संघात नव्या दमाचे खेळाडू तयार करण्यावर भर देत आहे. तो तरुण गोलंदाजांना संधी देत युवा संघ उभा करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनामुळे आधीच काही युवा खेळाडूंना संघाबाहेर बसावं लागलं. आता शमी संघात परतल्यास आणखी एका तरुण खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवायला लागणार आहे.


शमीच्या पुनरागमनामुळे गौतम गंभीरचा आवडता खेळाडू हर्षित राणा याची जागा धोक्यात येऊ शकते. सध्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांसारखे अनुभवी गोलंदाज संघात आहेत. अशा स्थितीत संघात तिसरा अनुभवी वेगवान गोलंदाज हवा असेल, तर शमीला प्राधान्य मिळू शकते आणि हर्षितला बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे.


कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात बंगालने गुजरातवर १४१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात शमीने एकहाती ८ बळी घेतले आणि विजयात मोठा वाटा उचलला. याआधीच्या सामन्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या. म्हणजेच केवळ दोन सामन्यांत त्याने तब्बल १५ विकेट्स मिळवून आपल्या फिटनेस आणि फॉर्मचं दमदार प्रदर्शन दाखवलं आहे.


सध्या भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे, त्यानंतर दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी शमीला संघात स्थान मिळतं का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जर त्याची निवड झाली, तर तो पुन्हा टेस्ट संघात परत येईल आणि संघ व्यवस्थापनासाठी निवड प्रक्रियेत मोठं आव्हान उभं राहील.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे