विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार


मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास अखंडित आणि सिग्नल-फ्री होणार आहे. यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


वसई विरारकरांपासून डहाणूच्या लोकांना रोज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला लोकप्रवाशी जीवघेणा ठरत आहे, यावर उपाय म्हणून आता विरार ते मारिन ड्राईव्ह असा मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गा मुळे विरारकरांना दिलासा मिळणार असून विरार ते वर्सोवा हे अंतर अवघ्या ४५ मिनिटात पूर्ण करता येणार आहे.


वाढत्या लोकसंख्येमुळे आणि दळणवळणामुळे मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, विशेषतः घोडबंदर येथील वाहतूक समस्या, यावर हा सागरी पूल प्रकल्प कायमस्वरूपी तोडगा ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत हा प्रकल्प साकारला जात आहे.


विरार कनेक्टर १८.९५ कि.मी थेट दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेशी (वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग) जोडला जाईल. हा सी लिंक पूर्ण झाल्यानंतर, दहिसर-भाईंदर कोस्टल रोड आणि वर्सोवा कोस्टल रोडच्या माध्यमातून, थेट मरीन ड्राइव्ह (दक्षिण मुंबई) पासून प्रवास सुरू करून विरारपर्यंत अखंडित आणि सिग्नल-मुक्त प्रवास करणे शक्य होणार आहे. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वे आणि लोकल ट्रेनवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्या वर्सोवा ते विरार हे अंतर पार करण्यासाठी जवळपास दोन तासांचा वेळ लागतो, जो या प्रकल्पामुळे केवळ ४५ मिनिटांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.



प्रकल्पाची वैशिष्ट्ये


- मुख्य सागरी पूल २४.३५ कि.मी. उत्तन ते विरार दरम्यान समुद्रावरून जाणारा मुख्य मार्ग.
- एकूण कनेक्टर्स ३०.७७ कि.मी. प्रकल्पाला मुख्य रस्त्यांशी जोडणारे मार्ग.
- उत्तन कनेक्टर ९.३२ कि.मी. वर्सोवा-भायंदर-दहिसर कोस्टल रोडशी जोडला जाईल.
- वसई कनेक्टर २.५० कि.मी. पूर्णपणे उन्नत मार्ग.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे दवाखाने अष्टौप्रहर सुरु ठेवा; स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे निर्देश

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात.

कमला मिलमध्ये महापालिकेची न भूतो, न भविष्यती कारवाई; डॉ अश्विनी जोशी यांनी अशक्य गोष्ट केली शक्य

मुंबई: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी चाबूक हाती घेताच याच्या महसूल

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक