१४२ दिवसांच्या योगनिद्रेनंतर जागे होतील श्री हरी विष्णू; 'या' राशींसाठी आहे अत्यंत शुभ काळ!

मुंबई : हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाणारी देवउठनी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी लवकरच येत आहे. या दिवशी सृष्टीचे पालनकर्ता मानले जाणारे भगवान विष्णू तब्बल १४२ दिवसांच्या (चार महिन्यांच्या) योगनिद्रेतून जागे होतात. याच दिवसापासून विवाह, मुंडन, गृहप्रवेश अशा सर्व शुभ कार्यांची पुन्हा एकदा सुरुवात होते.


आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो, ज्यामध्ये भगवान विष्णू पाताळ लोकात राजा बळीच्या दारात विश्रांती घेतात. देवउठनी एकादशीला भगवान विष्णू जागे होतात आणि चातुर्मास समाप्त होतो. भगवान विष्णूंच्या जागृतीने सृष्टीत शुभ कार्यांचे आरंभ होते. या दिवसापासून थांबलेले विवाह, गृहप्रवेश आणि इतर मंगल कार्यांना सुरुवात होते. त्यामुळे या दिवसाला तुळशी विवाह म्हणूनही विशेष महत्त्व आहे, जो या एकादशीला किंवा त्यानंतर साजरा केला जातो.


या दिवशी विष्णू भक्त उपवास करतात आणि त्यांची विशेष पूजा करतात. घरामध्ये तुळशी वृंदावन सजवून श्री विष्णूंचे आगमन आणि तुळशी विवाहाचा सोहळा केला जातो.



या राशींसाठी एकादशी आहे अत्यंत शुभ


मेष


मेष राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक लाभाचे योग आहेत. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. श्री हरिंच्या आशीर्वादाने एखादी आनंदाची वार्ता तुमच्या जीवनात प्रवेश करू शकते. आनंदाने भरलेले दिवस सुरू होणार आहेत.


कर्क


कर्क राशींच्या व्यक्तींसाठी व्यापारात प्रगतीचे नवे संकेत मिळत आहेत. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक दृष्टीने अतिशय अनुकूल काळ आहे. तुम्ही एखाद्या नव्या प्रोजेक्टची सुरूवात करू शकता. सोबतच तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल.


वृश्चिक


देवउठनी एकादशीपासून वृश्चिक राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगती तसेच मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी शुभ वेळ आहे. आर्थिकरित्या स्थिती अधिक स्थिर आणि सशक्त बनेल.


कुंभ


कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आनंदाचा काळ आहे. प्रयत्न यशस्वी होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात सामंजस्य आणि प्रेम वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा कालावझी प्रगती आणि यशाचा आहे.

Comments
Add Comment

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता