तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकतो, असा इशारा एका नव्या वैज्ञानिक अभ्यासातून देण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, रात्रीच्या वेळी उजेडात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक असतो.


संशोधकांनी हजारो लोकांच्या झोपेच्या सवयी आणि आरोग्याचा अभ्यास केला. त्यात असे आढळले की, जे लोक रात्री झोपताना खोलीत दिवा, टीव्ही किंवा इतर कोणत्याही प्रकारचा तेजस्वी प्रकाश चालू ठेवतात, त्यांना हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. रात्रीचा प्रकाश शरीरातील नैसर्गिक जैविक घड्याळ बिघडवतो. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते, रक्तदाब वाढतो आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या क्रियांवरही परिणाम होतो. त्यामुळेच हृदयविकार आणि इतर गंभीर आजार टाळण्यासाठी रात्री झोपताना पूर्ण अंधारात झोपण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.


यावर उपाय म्हणून झोपताना दिवे बंद ठेवावेत, झोपेच्या खोलीत पडदे लावावेत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहरी भागात रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील दिवे, घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर झगमगाटामुळे नागरिक सतत प्रकाशाच्या संपर्कात असतात. त्यामुळे या भागातील लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. नागरिकांनी आपल्या झोपेच्या सवयींमध्ये बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल

Railway Security : दगडफेक करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाची ड्रोनद्वारे करडी नजर

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या