भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात


मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली गेली. ज्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने २ विरुद्ध १ असा विजय मिळवला. उभय संघांमध्ये आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, टी-२० मध्ये भारतीय संघ नक्कीच जोरदार पलटवार करण्याच्या तयारीत आहे.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा थरार २९ ऑक्टोबरपासून रंगणार आहे. ही मालिका पाच सामन्यांची असल्यामुळे ती ऑक्टोबरमध्ये सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालेल. या मालिकेसाठी भारतीय संघात बदल झालेले दिसतील. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करत होता, तर आता टी-२० मध्ये कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादव यांच्या हाती असेल. या मालिकेत नवीन आणि युवा खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळेल.



भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक


टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे खेळला जाईल. यानंतर, दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. २ नोव्हेंबर रोजी मालिकेतील तिसरा सामना होबार्ट येथे खेळवण्याचे निश्चित झाले आहे. ६ नोव्हेंबर रोजी मालिकेतील चौथा सामना गोल्ड कोस्ट येथे होईल. त्यानंतर, ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेन येथे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जाईल. या सामन्यासह या दीर्घ मालिकेची सांगता होईल.



सामने किती वाजता सुरू होणार?


वनडे मालिका सुरू असताना, भारतीय वेळेनुसार सामने सकाळी ९.३० वाजता सुरू व्हायचे आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपत होते. परंतु, आता टी-२० मालिकेचे सामन्यांसाठी वेळेत मोठा बदल झाला आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होतील. म्हणजेच, सामन्याचा पहिला चेंडू पाऊणे दोन वाजता टाकला जाईल. या वेळेच्या अर्धा तास आधी, म्हणजे १ वाजून १५ मिनिटांनी टॉस होईल. हे सामनेही सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत संपण्याची अपेक्षा आहे.



भारतात थेट प्रक्षेपण, लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहावे?


भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. तर थेट लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

Comments
Add Comment

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय