आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

मतदार याद्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; राहुल गांधींसारखे 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला'


मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये "घोळ" झाल्याचे पुराव्यांसह मांडले होते. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.


आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, "आदित्य ठाकरेंनी मी 'महाराष्ट्राचा पप्पू' आहे, असे प्रदर्शन करू नये. मी त्यांना 'महाराष्ट्राचा पप्पू' म्हणणार नाही, पण त्यांनी राहुल गांधी बनू नये, अशी माझी अपेक्षा आहे."


ते पुढे म्हणाले, "राहुल गांधी जसे मोठी स्क्रीन लावतात, येरझाऱ्या घालतात, पण त्यातून 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला' असेच घडते. आदित्य ठाकरेंनी हेच केले आहे."


आदित्य ठाकरेंनी जे मुद्दे उपस्थित केले, त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिलेली आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य