आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

मतदार याद्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; राहुल गांधींसारखे 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला'


मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये "घोळ" झाल्याचे पुराव्यांसह मांडले होते. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.


आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, "आदित्य ठाकरेंनी मी 'महाराष्ट्राचा पप्पू' आहे, असे प्रदर्शन करू नये. मी त्यांना 'महाराष्ट्राचा पप्पू' म्हणणार नाही, पण त्यांनी राहुल गांधी बनू नये, अशी माझी अपेक्षा आहे."


ते पुढे म्हणाले, "राहुल गांधी जसे मोठी स्क्रीन लावतात, येरझाऱ्या घालतात, पण त्यातून 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला' असेच घडते. आदित्य ठाकरेंनी हेच केले आहे."


आदित्य ठाकरेंनी जे मुद्दे उपस्थित केले, त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिलेली आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

२९ महापालिकांवर महायुतीचाच भगवा फडकणार! - नवनाथ बन; मुंबई महापालिका निवडणूक ही एका कुटुंबाची शेवटची लढाई

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकास कामांच्या बळावर आधीच मारले आहे. मुंबईचा विकास

'संजय राऊतांनी आधी आजारपणातून ठणठणीत बरे व्हावे आणि मग उबाठाची वाट लावावी'; मंत्री संजय शिरसाटांचा खोचक टोला

छत्रपती संभाजीनगर: आगामी निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे.

धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अग्निशमन प्रणाली झाली जुनी; धुर शोध प्रणालीही नाही अस्तित्वात

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर

विक्रोळीतील निवडणूक गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे बंद

आता नव्याने सी सी टिव्ही कॅमेरांसह फायर अलार्म प्रणाली बसवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): निवडणूक खात्याच्या

मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आता हेल्थ चॅटबॉट; भविष्यात रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही करणार सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या