राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार राज्यात दररोज सरासरी ६१ बालकांवर अत्याचार होत असून, त्यापैकी २४ बालकांवर लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.


२०२३ मध्ये राज्यात बालकांवरील अत्याचाराचे एकूण २२ हजार ३९० गुन्हे नोंदवले गेले होते. २०२२ च्या तुलनेत ते एक हजार ६२८ ने अधिक आहेत. संपूर्ण देशात नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा वाटा सुमारे १३ टक्के आहे. गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेश २२ हजार ३९३ गुन्ह्यांसह प्रथम, तर महाराष्ट्र २२ हजार ३९० गुन्ह्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दर लाख बालकांमागील गुन्ह्यांचा दर लक्षात घेतल्यास महाराष्ट्र देशात दहाव्या स्थानी असून, येथे दर लाख बालकांमागे ६१ गुन्हे नोंदले गेले आहेत. सर्वाधिक गुन्ह्यांचा दर अंदमान आणि निकोबार बेटे (१४३.४), दिल्ली (१४०.३), चंदिगड (९०.७), आसाम (८४.२) आणि मध्य प्रदेश (७७.९) मध्ये आहे.


क्राय संस्थेच्या विश्लेषणानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक बालकांवरील गुन्ह्यांनुसार मुंबईत जिल्ह्यात (३,११०), ठाण्यात (१,६३८), पुण्यात (१,२३४), मीरा-भाईंदरमध्ये (१,०१६) आणि पुणे ग्रामीण (८७८) जिल्ह्यांमध्ये नोंदले गेले आहेत. लहान मुलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.



अपहरणांचे प्रमाण अधिक


राज्यातील गुन्ह्यांमध्ये १२ हजारांहून अधिक गुन्हे अपहरणाशी संबंधित आहेत.


त्याचबरोबर, आठ हजारांहून अधिक गुन्हे लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत, ज्यात मुंबईत १,११०, ठाणे ४४७, पुणे ४३१, पुणे ग्रामीण ४०० आणि मीरा भाईंदर-वसई विरारमध्ये ३३३ गुन्हे नोंदले गेले आहेत.

Comments
Add Comment

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा

कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बस सोडणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): बंदा क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक