बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट’ केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित तरुणीने शाहिद शेख नावाच्या तरुणासोबत हा करार करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषदेकडे मदत मागितली.


मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने या कराराची प्रत स्वतःच्या आईला पाठवली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषदेकडे धाव घेतली. परिषदेकडून हस्तक्षेप झाल्यानंतर तरुणीला घरी आणण्यात आले, मात्र काही दिवसांनी ती पुन्हा घर सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.


सदर तरुणी मालाड येथे शिक्षण घेत असताना शाहिद शेखच्या संपर्कात आली होती. या दोघांमध्ये ओळख झाली आणि ती ओळख प्रेमात रुपांतरित झाली आणि त्यांनी लग्नाऐवजी केवळ करार करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला.


या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेने याला ‘लव्ह जिहाद’चे नवीन स्वरूप असल्याचा आरोप केला आहे. परिषदेकडून या प्रकाराचा निषेध करण्यात आला असून, अशा ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’द्वारे होणाऱ्या प्रकरणांवर पोलिसांनी आणि सामाजिक संघटनांनी लक्ष ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे ‘लिव्ह-इन अ‍ॅग्रीमेंट’सारख्या नव्या संकल्पनांवर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

Indigo Flight Cancellations : इंडिगोच्या गोंधळामुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, असे करा प्रवासाचे नियोजन किंवा मिळवा रिफंड

मुंबई : देशातील सर्वात स्वस्त विमानसेवा म्हणून मिरवणाऱ्या इंडिगो कंपनीची आठवड्याभरात काही हजार उड्डाणं रद्द

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आयोगाने जाहीर केल्या नव्या तारखा

मुंबई : एमपीएससीची २१ डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आयोगाने नव्या तारखा जाहीर करून

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची