बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट’ केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित तरुणीने शाहिद शेख नावाच्या तरुणासोबत हा करार करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषदेकडे मदत मागितली.


मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने या कराराची प्रत स्वतःच्या आईला पाठवली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषदेकडे धाव घेतली. परिषदेकडून हस्तक्षेप झाल्यानंतर तरुणीला घरी आणण्यात आले, मात्र काही दिवसांनी ती पुन्हा घर सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.


सदर तरुणी मालाड येथे शिक्षण घेत असताना शाहिद शेखच्या संपर्कात आली होती. या दोघांमध्ये ओळख झाली आणि ती ओळख प्रेमात रुपांतरित झाली आणि त्यांनी लग्नाऐवजी केवळ करार करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला.


या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेने याला ‘लव्ह जिहाद’चे नवीन स्वरूप असल्याचा आरोप केला आहे. परिषदेकडून या प्रकाराचा निषेध करण्यात आला असून, अशा ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’द्वारे होणाऱ्या प्रकरणांवर पोलिसांनी आणि सामाजिक संघटनांनी लक्ष ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे ‘लिव्ह-इन अ‍ॅग्रीमेंट’सारख्या नव्या संकल्पनांवर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

जे. के. सावंत मार्ग जोडणारा येलवे रस्ता सेनापती बापट मार्गाला जोडणार मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

भरती परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या

वरळी विधानसभेत प्रभाग आरक्षित झाल्याने मनसेची पंचाईत

भाजप, शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग यंदा वरळीत भाजप कमळ फुलवणार? सचिन धानजी मुंबई : दक्षिण

राज्यात अनेक जिल्ह्यांना आज थंडीचा इशारा

मुंबई : राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी (दि. १८