बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट’ केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित तरुणीने शाहिद शेख नावाच्या तरुणासोबत हा करार करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषदेकडे मदत मागितली.


मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने या कराराची प्रत स्वतःच्या आईला पाठवली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषदेकडे धाव घेतली. परिषदेकडून हस्तक्षेप झाल्यानंतर तरुणीला घरी आणण्यात आले, मात्र काही दिवसांनी ती पुन्हा घर सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.


सदर तरुणी मालाड येथे शिक्षण घेत असताना शाहिद शेखच्या संपर्कात आली होती. या दोघांमध्ये ओळख झाली आणि ती ओळख प्रेमात रुपांतरित झाली आणि त्यांनी लग्नाऐवजी केवळ करार करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला.


या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेने याला ‘लव्ह जिहाद’चे नवीन स्वरूप असल्याचा आरोप केला आहे. परिषदेकडून या प्रकाराचा निषेध करण्यात आला असून, अशा ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’द्वारे होणाऱ्या प्रकरणांवर पोलिसांनी आणि सामाजिक संघटनांनी लक्ष ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे ‘लिव्ह-इन अ‍ॅग्रीमेंट’सारख्या नव्या संकल्पनांवर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासन मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

सिध्दार्थ रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास संथगतीने, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक

भांडुप रेल्वेवरील पुलाचे बांधकाम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

आयआयटीकडून आराखड्याची पडताळणी मुंबई : भांडुप रेल्वेवरील भांडुप पूर्व आणि पश्चिम यांना थेट जोडणारा पूल वीर