मुंबईकरांच्या सेवेत १५० नवीन इलेक्ट्रिक बेस्ट बस सज्ज!२१ मार्गावर दररोज १.९ लाख प्रवाशांना लाभ

मुंबई: मुंबईतील परिवहन सेवा आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राज्य सरकारच्या ५००० नवीन बस आणण्याच्या घोषणेनुसार, बेस्ट (BEST) उपक्रमातील १५० नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडले.


मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाड्या देणे आणि प्रदूषण कमी करणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. "बेस्टची सेवा एकप्रकारे जीवनवाहिनी आहे," असेही ते म्हणाले.


नवीन १५० इलेक्ट्रिक बसगाड्या 'वेट लीज' (Wet Lease) पद्धतीने चालविल्या जाणार असून, यामुळे मुंबईतील शाश्वत (sustainable) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळेल.



बसचे वाटप आणि मार्ग


या बसगाड्या मुंबईतील २१ मार्गांवर धावणार आहेत, ज्यामुळे दररोज सुमारे १.९ लाख मुंबईकर प्रवाशांना दर्जेदार प्रवास अनुभवता येईल.


या बस ओशिवरा (८२), आणिक (३३), कुर्ला (११) आणि गोराई (२४) या डेपोंमधून चालवल्या जातील.


बसमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्पची सुविधा देण्यात आली आहे.


या बसगाड्या अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला, बांद्रा, कांदिवली आणि बोरिवली या उपनगरीय रेल्वे स्थानकांना मेट्रो लाईन १, २अ, ७ आणि ३ (अ‍ॅक्वा लाईन) या प्रमुख मेट्रो मार्गांशी जोडणी साधून अखंडित सेवा उपलब्ध करून देतील.


१५० नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश हा मुंबईतील स्वच्छ, हरित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

Comments
Add Comment

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात