बचत गटाच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणार : पालकमंत्री नितेश राणे

महिला सक्षमीकरणासाठी शासनाचे अनेक धाडसी निर्णय


वैभववाडी  : महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनाने धाडसी निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना महिलांना आत्मनिर्भयतेकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. शासनाच्या असंख्य योजनांमुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न गतीने वाढविण्यासाठी महिला सक्षम बनली पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.


वैभववाडी येथे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानांतर्गत मातृशक्ती महिला मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी ना. नितेश राणे म्हणाले, मोदींनी मागील दहा वर्षात घेतलेले निर्णय महिलांना आत्मनिर्भयतेकडे घेऊन जाणारे आहेत, परदेशी वस्तूवर अवलंबून न राहता देशाला स्वतःच्या ताकदीवर महासत्ता बनविण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी यांचे आहे. यासाठीच केंद्र व राज्य शासनाच्या असंख्य योजना तळागाळापर्यंत राबविण्यात येत आहेत. लखपती दीदी, मुख्यमंत्री लाडकी बहीण यासारख्या असंख्य योजनांचा पुरेपूर फायदा समाजातील महिलांना होत आहे. या योजनांमुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे. या योजना बंद होणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


जिल्ह्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून ५५ कोटींची उलाढाल होत आहे. दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी महिलांनी सक्षम बनले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभा करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. पहिल्या पाच मध्ये आपला मॉल असेल असे नितेश राणे यांनी सांगितले.


जिल्ह्यातील बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली उत्पादने पोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लवकरच मंत्रालयात बचत गटांसाठी खाद्य महोत्सव घेणार असे सांगितले. यावेळी नितेश राणे म्हणाले, महिलांना सक्षम बनवणारे नेतृत्व सत्तेत राहिले पाहिजे. याची काळजी महिला भगिनींनी घेतली पाहिजे. नेतृत्व राहिलं नाही तर योजना बंद पडेल असे त्यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदावर राहिले पाहिजेत असे नितेश राणे यांनी सांगितले. उमेद हे माध्यम आहे. उमेदच्या पाठीशी लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम उभा आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले. शितल पुंड म्हणाल्या, एक लाख उद्योजिका निर्माण झाल्या पाहिजेत. उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. महिलांनी स्वतः मेहनत घेतली पाहिजे.


नवीन गट तयार करा, दुसऱ्यांना मदत करा, चांगल्या उद्योजिका बना असे सांगितले. संध्या तेरसे म्हणाल्या, माता भगिनी सक्षम व्हाव्यात यासाठी आत्मनिर्भर अभियान सुरू आहे. शेवटच्या घटकातील माणूस आर्थिक आत्मनिर्भर व्हावा यासाठी नरेंद्र मोदीजी प्रयत्न करत आहेत. छोटे-मोठे उद्योग निर्माण करा, महिला सक्षम तर कुटुंब सक्षम, प्रत्येक व्यवसाय जबाबदारीने व कष्टाने उभा करा असे आवाहन त्यांनी केले. वैभववाडी भाजपच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

Comments
Add Comment

सिंधुदुर्गच्या समुद्रात अखेर विसावली युद्धनौका आयएनएस गुलदार; पर्यटकांना मिळणार अंडर वॉटर म्युझियमचा अनोखा अनुभव

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती समुद्रात आयएनएस गुलदार ही युद्धनौका अखेर संध्याकाळी पाच वाजता समुद्रतळाशी

Underwater Tourism : सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील अवकाळीग्रस्तांना तातडीने मदत द्या; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला आदेश

जिल्ह्यातील वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या अवकाळी

Sindhudurg : सिंधुदुर्गात अवकाळीचे तांडव, ४१ घरांची पडझड, लाखोंचे नुकसान

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटांसह

Guardian Minister Nitesh Rane : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि 'महाप्रित' मध्ये सामंजस्य करार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतींवर सौरऊर्जेचा प्रकाश महाराष्ट्रील नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वेक्षणाचे काम

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग