कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक


सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीनिमित्त वारकरी भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या येथील विभागीय कार्यालय प्रशासनाने चांगला निर्णय घेतला आहे. पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सोलापूर-मिरजमिरज-लातूर या मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचे घोषित केले आहे.


गुरूवार, 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या काळात रेल्वेच्या 36 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.गाडी क्रमांक 01443 मिरज-लातूर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता मिरजहून सुटून ती दुपारी 3:30 वाजता लातूरला पोहोचणार आहे. ती गाडी सकाळी 10:15 वाजता पंढरपूरच्या रेल्वेस्थानकावर येईल. गाडी क्रमांक 01444 ही लातूर-मिरज दररोज दुपारी 4:00 वाजता लातूरहून सुटून याच दिवशी रात्री 11:45 वाजता मिरजला पोहोचणार आहे.


या गाडीचे सकाळी 7:45 वाजता पंढरपूरच्या स्टेशनवर आगमन होईल. गाडी क्रमांक 01442 लातूर-मिरज ही दररोज सकाळी 6 वाजता लातूरच्या स्थानकावरून सुटून ती दुपारी 1:50 वाजता मिरजला पोहोचेल. गाडी क्रमांक 01441 मिरज-लातूर दररोज रात्री 10:00 वाजता मिरजच्या स्थानकावरून सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता लातूरच्या स्थानकावर पोहोचेल. तीच गाडी पुन्हा रात्री 11:50 वाजता पंढरपूरला पोहोचेल.


Comments
Add Comment

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या