एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सेवा वितरण अधिक प्रभावी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती मोहीम राबवित आहे. बँक येत्या काही महिन्यांत सुमारे ३,५०० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती एसबीआयचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य विकास अधिकारी किशोर कुमार पोलुदासू यांनी दिली.


त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने जून महिन्यात ५०५ प्रोबेशनरी ऑफिसर्स (पीओ) ची भरती पूर्ण केली असून तितक्याच पदांसाठी प्रक्रिया सुरू आहे. तसेच, १,३०० आयटी आणि सायबरसुरक्षा तज्ज्ञ अधिकारी यांची निवड आधीच करण्यात आली आहे. आणखी ५४१ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडते, प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मानसोपचार चाचणीसह मुलाखत असेल.


याशिवाय, पोलुदासू यांनी सांगितले की सुमारे ३,००० मंडळ आधारित अधिकाऱ्यांच्या भरतीचा विचार सध्या सुरू असून हे सर्व काम चालू आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.


बँकेचे अध्यक्ष सी. एस. सेट्टी यांनी याआधी सांगितले होते की, चालू आर्थिक वर्षात विविध श्रेणींमध्ये एकूण १८,००० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यापैकी सुमारे १३,५०० लिपिक पदे, तर उर्वरित प्रोबेशनरी अधिकारी आणि स्थानिक पातळीवरील अधिकारी असतील.


महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाबाबत बोलताना पोलुदासू म्हणाले की, एसबीआयने पाच वर्षांत महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण जवळपास ३३ टक्के आहे, तर एकूण कर्मचाऱ्यांमध्ये २७ टक्के आहे.


त्यांनी सांगितले की, बँक महिलांसाठी अनुकूल कार्यस्थळ निर्माण करण्यावर भर देत आहे. एसबीआय ‘एम्पॉवर हर’ सारख्या उपक्रमांद्वारे महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत असून, पाळणाघर भत्ता, ‘फॅमिली कनेक्ट’ कार्यक्रम, तसेच प्रसूती किंवा दीर्घ रजेवरून परतणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देत आहे.


सध्या एसबीआयमध्ये २.४ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून ती देशातील सर्वात मोठी नियोक्ता संस्था म्हणून ओळखली जाते. बँकेचे उद्दिष्ट आहे की, महिलांना सर्व स्तरांवर संधी देऊन एक संतुलित, समावेशक आणि प्रेरणादायी कार्यसंस्कृती विकसित करणे, हे बँकेचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

BMC News : प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने स्वतंत्र एसओपी

मोर्शी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डम्पिंग ग्राऊंडवरील

Organ Donation Awareness : अवयवदानाचा संकल्प करत आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी साजरा केला वाढदिवस

अवयव दान चळवळीचे नेतृत्व करणार भांदिर्गे मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई: वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, केक आणि

Kolhapur Vaibhavwadi Railway Line :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन

मंत्री नितेश राणे; ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनासाठी प्रयत्न मुंबई (सुहास शेलार)

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि