परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. दिवसभर ऊन आणि सायंकाळी वादळी पावसाच्या सरींमुळे कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान झाले. कापलेले भातपीक शेतातच भिजल्याने त्याला कोंब फुटले असून पेंढा कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरांसाठी चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

अलिबाग तालुक्यातील खारेपाठ विभाग, रेवस, हाशिवरे, माणकुळे, शिरवली, नारंगी, फोफेरी, पेढांबे, वाघ्रण, सातघर, लोणघर, कोपर, चरी, शहापूर, शहाबाज आणि पोयनाड परिसरात शेतकऱ्यांच्या भातशेतीचे पूर्णतः नुकसान झाले आहे. चिखलात अडकलेले आणि पडलेले पीक कुजल्याने शेतकरी निराश आणि हताश झाला आहे.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हा प्रमुख कृष्णकांत पाटील यांनी शासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. “फक्त घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष मदत मिळाली पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांनी अलिबाग प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना या संदर्भात लेखी निवेदन देण्याचे सांगितले.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून, रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरसकट पंचनामे करून विशेष हेक्टरी मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत आणि गुंतवणूक एका झटक्यात पाण्यात गेली असून, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी चालू पीककर्ज माफ करून नवी मदत योजना तातडीने राबवावी.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी