भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. याआधीच नियम आणि परंपरेला अनुसरुन सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून एका वरिष्ठ न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस केली आहे. ही शिफारस सरन्यायाधीशांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवली आहे. आता देशाच्या ५३ व्या सरन्यायाधीशांच्या निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे.



याआधी भारताचे ५१ वे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाले आणि ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सूत्रं हाती घेतली होती. गवई यांनी १४ मे २०२५ रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती. ते २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर सूर्यकांत हे देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रं हाती घेण्याची शक्यता आहे. सूर्यकांत हे ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होणार आहेत.


भारतात सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांसाठी निवृत्तीचे वय ६५ वर्ष हे आहे. सरन्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती यांना हा नियम लागू आहे. नियम आणि परंपरेला अनुसरुन कार्यरत सरन्यायाधीश हे निवृत्त होण्याआधी पुढील सरन्यायाधीश म्हणून एका नावाची शिफारस करतात. ही शिफारस सरन्यायाधीशांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवायची असते. यानंतर सरन्यायाधीशांच्या निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू होते.

Comments
Add Comment

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी