भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. याआधीच नियम आणि परंपरेला अनुसरुन सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून एका वरिष्ठ न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस केली आहे. ही शिफारस सरन्यायाधीशांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवली आहे. आता देशाच्या ५३ व्या सरन्यायाधीशांच्या निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे.



याआधी भारताचे ५१ वे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाले आणि ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सूत्रं हाती घेतली होती. गवई यांनी १४ मे २०२५ रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती. ते २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर सूर्यकांत हे देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रं हाती घेण्याची शक्यता आहे. सूर्यकांत हे ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होणार आहेत.


भारतात सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांसाठी निवृत्तीचे वय ६५ वर्ष हे आहे. सरन्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती यांना हा नियम लागू आहे. नियम आणि परंपरेला अनुसरुन कार्यरत सरन्यायाधीश हे निवृत्त होण्याआधी पुढील सरन्यायाधीश म्हणून एका नावाची शिफारस करतात. ही शिफारस सरन्यायाधीशांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवायची असते. यानंतर सरन्यायाधीशांच्या निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू होते.

Comments
Add Comment

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय