अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे


अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तसेच २५ नोव्हेंबर रोजी राम मंदिराच्या शिखरावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद ध्वजारोहण करतील. हा समारंभ भव्य प्राणप्रतिष्ठा समारंभासारखाच भव्य असेल आणि राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचेही प्रतीक असेल.


या कार्यक्रमासाठी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा मोठा मेळावा होणार आहे. जो पक्षाच्या नवीन मोहिमेचा शुभारंभ देखील असेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान जगातील सर्वात मोठ्या स्काऊट गाईड टीमला देखील आमंत्रित करण्याची शक्यता आहे. यात ३५ हजारापेक्षा जास्त कॅडेड सहभागी घोण्याची शक्यता आहे.


श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांच्या मते, वाल्मिकी रामायणात दाखवल्याप्रमाणे सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाची चिन्हे असलेला भगवा ध्वज २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर असलेल्या ४२ फूट उंच स्तंभावर फडकवला जाईल. गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, पाच दिवसांचा हा सोहळा २१ नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि २५ नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण समारंभाने संपेल.

Comments
Add Comment

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या