मुंबईजवळ ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, १४ कोटींची ड्रग्स जप्त

वसई : वसईच्या पेल्हार येथे मुंबई पोलिसांच्या झोन सहामधील अँटीनार्कॉटिक्स सेल आणि टिळक नगर पोलिसांनी मिळून केलेल्या कारवाईत एका ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. पेल्हार येथील रशीद कंपाउंडमध्ये राजरोसपणे MD ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू होता. महत्वाचं म्हणजे याचा मास्टरमाईंड दुबईतून MD ड्रग्स फॅक्टरी ऑपरेट करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का ? याचा तपास सुरु आहे.



काही दिवसांपूर्वी टिळकनगर पोलीस ठाण्यात ड्रग्स संदर्भात एक गु्न्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी तपास सुरू असताना ड्रग्सच्या कारखान्याबाबत माहिती मिळाली. माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत सात किलोपेक्षा जास्त ड्रग्सचा साठा सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेक्षात याची किंमत १४ कोटी रुपये असल्याचे सांगितलं जात आहे.


ज्या ठिकाणी धाड टाकण्यात आली त्या ठिकाणापासून जवळच पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन जवळ असूनही या भागात ड्रग्स फॅक्टरी सुरू होती. काही दिवसांपूर्वी जवळच असलेल्या कामन या गावात ड्रग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्यानंतर आता पेल्हार येथील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स निर्मितीचा कारखाना सुरू होता, जो बंद करण्यात आला.

Comments
Add Comment

IPL 2026 CSK vs KKR : चेन्नईचा चेपॉकवर दबदबा! चेन्नईचा कोलकातावर ३२ धावांनी विजय

मुंबई : आयपीएलच्या २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाइट रायडर्सवर शानदार विजय मिळवत स्पर्धेत आपली

PM Modi - Trump Phone Call : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवार १३ एप्रिल रोजी सुमारे ४० मिनिटे दूरध्वनीवर चर्चा

Bihar : बिहारमध्ये बुधवारी सकाळी तीन नेतेच घेणार शपथ

पाटणा : जवळपास दोन दशकं बिहारचे नेतृत्व करणाऱ्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. आता ते

Chhattisgarh : वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट, अनेकांचा मृत्यू

शक्ती : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात वेदांता कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ

Ashok Kharat Case : अशोक खरातला पुन्हा ५ दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक : भोंदूगिरी व महिलांच्या शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढल्या असून,

Crime : मानवी तस्करी प्रकरणी ८ अटकेत, १६३ मुलांची सुटका

कटनी : बिहारमधून महाराष्ट्रात नेण्यात येत असलेल्या १६३ मुलांना मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर रविवारी