मुंबईजवळ ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, १४ कोटींची ड्रग्स जप्त

वसई : वसईच्या पेल्हार येथे मुंबई पोलिसांच्या झोन सहामधील अँटीनार्कॉटिक्स सेल आणि टिळक नगर पोलिसांनी मिळून केलेल्या कारवाईत एका ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. पेल्हार येथील रशीद कंपाउंडमध्ये राजरोसपणे MD ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू होता. महत्वाचं म्हणजे याचा मास्टरमाईंड दुबईतून MD ड्रग्स फॅक्टरी ऑपरेट करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का ? याचा तपास सुरु आहे.



काही दिवसांपूर्वी टिळकनगर पोलीस ठाण्यात ड्रग्स संदर्भात एक गु्न्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी तपास सुरू असताना ड्रग्सच्या कारखान्याबाबत माहिती मिळाली. माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत सात किलोपेक्षा जास्त ड्रग्सचा साठा सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेक्षात याची किंमत १४ कोटी रुपये असल्याचे सांगितलं जात आहे.


ज्या ठिकाणी धाड टाकण्यात आली त्या ठिकाणापासून जवळच पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन जवळ असूनही या भागात ड्रग्स फॅक्टरी सुरू होती. काही दिवसांपूर्वी जवळच असलेल्या कामन या गावात ड्रग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्यानंतर आता पेल्हार येथील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स निर्मितीचा कारखाना सुरू होता, जो बंद करण्यात आला.

Comments
Add Comment

Nashik Firing : नाशिकमध्ये पानटपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार

नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं