श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक बोया किनाऱ्यावर आढळली. ही अनोळखी बोया पाहून नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत मेरीटाईमचे कर्मचारी नितेश तांबे यांनी तात्काळ पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर श्रीवर्धन पोलीस व मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन दखल घेतली. तसेच रायगड पोलिसांचे ब्रुनो हे श्वानपथक पाचरण करून तपास करण्यात आला.


मेरिटाईम बोर्डाचे निलेश तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार,रायगड मधील बागमांडला ते रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट दरम्यान खाडी पुलाच्या पिलरचे काम चालू आहे. यावेळी बाणकोट सागरी पोलीस ठाणे हद्दीत एक बार्ज बुडाली होती. ती बुडालेले बार्ज समुद्रातून वर खेचण्याकरिता ओहोटीच्या वेळेस बार्जला बोया बांधून ठेवण्यात आली होती. ज्यामुळे भरतीच्या वेळेला लाटांच्या आधाराने बार्ज तरंगत असताना बाहेर काढता येईल. यासाठी बोयाचा वापर केला होता. परंतु हवामान खराब असल्याने बोयाचा दोर तुटून ती समुद्रात भरकटून गेली. असे बुडालेल्या बार्जचे मालक अब्दुल रजाक अन्सारी यांनी सांगितले.



किनाऱ्यावर बोया आढळून आल्यावर श्रीवर्धन मेरिटाईम बोर्ड अधिकाऱ्यांनी बार्जचे मालक अब्दुल रजाक अन्सारी यांना संपर्क केला होता. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. ही बोया आता श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर आढळली आहे.

Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड