दिल्लीत २० वर्षीय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला !

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच परिचित असलेल्या तरुणाने दोन मित्रांच्या मदतीने ॲसिड हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.


पीडित विद्यार्थिनी लक्ष्मीबाई कॉलेज, अशोक विहार येथे ट्युशनसाठी जात असताना हा हल्ला झाला. ती रस्त्याने जात असताना मुकुंदपूरचा रहिवासी जितेंद्र आणि त्याचे दोन साथीदार ईशान आणि अरमान यांच्यासह मोटारसायकलवर आला. पोलिसांच्या माहितीनुसार, ईशानने अरमानला ॲसिडची बाटली दिली आणि अरमानने ती विद्यार्थिनीवर फेकली. विद्यार्थिनीने चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचे दोन्ही हात गंभीररित्या भाजले. हल्ल्यानंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले.


प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, जितेंद्र गेल्या काही दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. सुमारे एक महिन्यापूर्वी याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला होता. पोलिसांच्या मते, त्याच रागातून जितेंद्रने आपल्या मित्रांसह हा भयंकर हल्ला केला. ही घटना रविवारी सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास घडली.


घटनेनंतर नागरिकांनी जखमी विद्यार्थिनीला तातडीने दीपचंद बंधू रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन क्राईम ब्रांच आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या टीमला घटनास्थळी पाठवले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत (Bharatiya Nyaya Sanhita – BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या अटकेसाठी विविध पथके कार्यरत आहेत.


या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

'धंगेकर- मोहोळ हा विषय आता संपला, महायुतीमध्ये मतभेद नकोत' : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारल्या जातील आळंदी  : कार्तिकी एकादशी आणि त्यानिमित्त होणाऱ्या

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: PSI बदनेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

सातारा : फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या