नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव माने (वय 71) आणि त्यांच्या पत्नी ॲड. रत्नमाला साळुंके-माने (वय 64) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी गेलेल्या या दाम्पत्याला घराकडे परतताना एका कारने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही दूरवर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


छत्रपती संभाजीनगरच्या नंदनवन कॉलनीचे रहिवासी असलेले डॉ. माने यांचे पडेगावच्या देशमुखनगरमध्येही निवासस्थान होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका नातेवाईकाचं निधन झालं होतं. काल (25 ऑक्टोबर) सायंकाळी माने दाम्पत्य त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना भेटून दोघेही पडेगावच्या रस्त्यावर आले. देशमुखनगरकडे जाण्यासाठी दोघेही एकमेकांचा हात पकडून रस्ता ओलांडत असताना नगरनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारचालकाने त्यांना उडवले. दोघेही दूरवर फेकले गेले. डोके, छातीला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉ. रामराव माने आणि विधिज्ञ ॲड. रत्नमाला साळुंके-माने अशी त्यांची नावे आहेत.


ही घटना काल सायंकाळी सुमारे 6.30 वाजता पडेगावजवळ घडली. माने दाम्पत्य रस्ता ओलांडत असताना नगरनाक्याच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना चिरडले. अपघातानंतर कारचालक पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.


मूळ धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथील डॉ. रामराव माने हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात 1980 ते 2024 या काळात कार्यरत होते. त्यांनी अधिसभा आणि व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली होती. विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्र उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रासह सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. माने दाम्पत्याचे पार्थिव आज त्यांच्या मूळगावी रुईभर (धाराशिव) येथे नेण्यात येणार असून, सायंकाळी 4.30 वाजता अंत्यसंस्कार पार पडतील. या दुर्दैवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य