महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फूटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





ही घटना सणाच्या दिवशी घडली असून, सीसीटीव्हीमध्ये तीन महिला दुकानात येताना दिसतात. त्यापैकी दोन महिला काउंटरजवळ बसतात, तर तिसरी थोड्या अंतरावर थांबते. महिला कर्मचारी त्यांना अंगठ्यांचा बॉक्स दाखवते. कर्मचारी दुसरी अंगठी काढण्यासाठी वळताच, एका महिलेनं चतुराईने बॉक्समधून सोन्याची अंगठी उचलली आणि शेजारी बसलेल्या मुलीला दिली. त्या मुलीनं ती अंगठी आपल्या पर्समध्ये ठेवली. हे सर्व काही सेकंदात घडलं आणि कर्मचाऱ्याला याची काहीच कल्पनाही आली नाही.


काही वेळानंतर स्टॉक तपासताना दुकानातील कर्मचाऱ्यांना अंगठी गायब असल्याचे लक्षात आले. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. लक्ष्मी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरातील ज्वेलरी व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून