तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद, भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर समितीने घेतला निर्णय

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची आई तुळजाभवानी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. याच कारणामुळे या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. लागोपाठ असणाऱ्या सुट्ट्यांमुळे आणि दिवाळीच्या सणामुळे सध्या मंदिरात प्रचंड गर्दी आहे. वाढलेली ही अलोट गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मुख्य प्रवेशद्वार दोन दिवसासाठी बंद


मंदिर संस्थानाच्या निर्णयानुसार आज (शनिवार ) आणि उद्या (रविवार ) असे दोन दिवस मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद असणार आहे. या दोन दिवसात मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी घाटशीळ बाजूकडून मंदिरात येण्याचा मार्ग खुला करून देण्यात येणार आहे.


२०० रुपयांचे पास बंद


मंदिर संस्थानांकडून आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे गर्दीच्या व्यवस्थापनासाठी २०० रुपयांचे पास देखील पुढील २ दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना एकाच रांगेतून दर्शनासाठी जावे लागणार आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता राखून देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थानाने केले आहे.

Comments
Add Comment

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या

दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत