तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद, भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर समितीने घेतला निर्णय

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची आई तुळजाभवानी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. याच कारणामुळे या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. लागोपाठ असणाऱ्या सुट्ट्यांमुळे आणि दिवाळीच्या सणामुळे सध्या मंदिरात प्रचंड गर्दी आहे. वाढलेली ही अलोट गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मुख्य प्रवेशद्वार दोन दिवसासाठी बंद


मंदिर संस्थानाच्या निर्णयानुसार आज (शनिवार ) आणि उद्या (रविवार ) असे दोन दिवस मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद असणार आहे. या दोन दिवसात मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी घाटशीळ बाजूकडून मंदिरात येण्याचा मार्ग खुला करून देण्यात येणार आहे.


२०० रुपयांचे पास बंद


मंदिर संस्थानांकडून आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे गर्दीच्या व्यवस्थापनासाठी २०० रुपयांचे पास देखील पुढील २ दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना एकाच रांगेतून दर्शनासाठी जावे लागणार आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता राखून देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थानाने केले आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास