साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली होती. या व्यक्तीच्या अंगावर तब्बल १७ वार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा खून अत्यंत निर्दयीपणे केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना दोडामार्ग तिलारी वसाहतीच्या पुलाजवळ एक नंबर प्लेट नसलेली, रक्ताने माखलेली कार सापडली. त्यामुळे या कारचा आणि साळीस्ते येथे सापडलेल्या मृतदेहाचा काहीतरी संबंध असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.


ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बेंगलोर येथील दोन व्यक्तींना बोलावून घेतले. मात्र मृतदेहावर झालेल्या वारांमुळे चेहरा ओळखता न आल्याने खात्रीशीर ओळख पटू शकली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतदेहाची ओळख श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर, कर्नाटक) अशी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती डॉक्टर पेशातील असल्याची चर्चा सुरू आहे.



दरम्यान, या खुनामागील कारण काय? खून कुठे झाला ? आणि दोडामार्गमध्ये सापडलेली ती कार याचा या घटनेशी नेमका काय संबंध आहे ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून तपासाची गुप्तता पाळली जात असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ओळख पटल्यानंतर पोलिसांनी एक पथक श्रीनिवास रेड्डी यांच्या घराच्या दिशेने रवाना केले असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका