कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात बस पूर्ण जळून खाक झाली आणि १९ प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातानंतर तपासात समोर आले आहे की, बसमध्ये ४६ लाख रुपये किंमतीचे तब्बल २३४ स्मार्टफोन पार्सल स्वरूपात ठेवलेले होते. तज्ज्ञांच्या अहवालानुसार, या स्मार्टफोनच्या बॅटरी फुटल्यामुळे आग वेगाने पसरली, ज्यामुळे बसने लवकर पेट घेतला.


आंध्र प्रदेश अग्निशमन विभागाचे महासंचालक पी. व्यंकटरमण यांनी सांगितले की, आग बसच्या पुढील भागातील इंधन गळतीमुळे सुरू झाली असावी. बसखाली अडकलेल्या दुचाकीमुळे पेट्रोल सांडले आणि उष्णतेच्या संपर्कात येताच आग लागली. तसेच, बसमधील वातानुकूलन यंत्रणेतील इलेक्ट्रिकल बॅटरी फुटल्याने आग अधिक वेगाने पसरली.


तपासानुसार, हैदराबादमधील व्यापारी मंगानाथाने २३४ स्मार्टफोन बेंगळुरू येथील ई-कॉमर्स कंपनीकडे पार्सल म्हणून पाठवले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आग लागल्यानंतर बॅटरी फुटण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. या फुटलेल्या बॅटरीमुळे आग अशी तीव्र झाली आणि बसमध्ये असलेले प्रवासी बाहेर पळायला लागले.


व्यंकटरमण यांनी स्पष्ट केले की, बसची रचना हलक्या अॅल्युमिनियमने करण्यात आली होती, ज्यामुळे अपघाताच्या वेळी बसचे पत्रे पटकन वितळले. आग वेगाने पसरली आणि प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला.


हा अपघात तांत्रिक समस्यांमुळे आणि वाहनाच्या रचनेतील दोषांमुळे घडल्याचे आढळले आहे. आगीचा वेग इतका जास्त होता की प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे शक्य झाले नाही. ही दुर्घटना वाहन सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित करते, तसेच भविष्यात अशा घटनांपासून प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे हे पण सांगते.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या