कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात बस पूर्ण जळून खाक झाली आणि १९ प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातानंतर तपासात समोर आले आहे की, बसमध्ये ४६ लाख रुपये किंमतीचे तब्बल २३४ स्मार्टफोन पार्सल स्वरूपात ठेवलेले होते. तज्ज्ञांच्या अहवालानुसार, या स्मार्टफोनच्या बॅटरी फुटल्यामुळे आग वेगाने पसरली, ज्यामुळे बसने लवकर पेट घेतला.


आंध्र प्रदेश अग्निशमन विभागाचे महासंचालक पी. व्यंकटरमण यांनी सांगितले की, आग बसच्या पुढील भागातील इंधन गळतीमुळे सुरू झाली असावी. बसखाली अडकलेल्या दुचाकीमुळे पेट्रोल सांडले आणि उष्णतेच्या संपर्कात येताच आग लागली. तसेच, बसमधील वातानुकूलन यंत्रणेतील इलेक्ट्रिकल बॅटरी फुटल्याने आग अधिक वेगाने पसरली.


तपासानुसार, हैदराबादमधील व्यापारी मंगानाथाने २३४ स्मार्टफोन बेंगळुरू येथील ई-कॉमर्स कंपनीकडे पार्सल म्हणून पाठवले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आग लागल्यानंतर बॅटरी फुटण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. या फुटलेल्या बॅटरीमुळे आग अशी तीव्र झाली आणि बसमध्ये असलेले प्रवासी बाहेर पळायला लागले.


व्यंकटरमण यांनी स्पष्ट केले की, बसची रचना हलक्या अॅल्युमिनियमने करण्यात आली होती, ज्यामुळे अपघाताच्या वेळी बसचे पत्रे पटकन वितळले. आग वेगाने पसरली आणि प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला.


हा अपघात तांत्रिक समस्यांमुळे आणि वाहनाच्या रचनेतील दोषांमुळे घडल्याचे आढळले आहे. आगीचा वेग इतका जास्त होता की प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे शक्य झाले नाही. ही दुर्घटना वाहन सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित करते, तसेच भविष्यात अशा घटनांपासून प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे हे पण सांगते.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला