कधी आहे कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि पूजा विधी

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पाला समर्पित असते. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दोन्ही दिवशी भाविक गणेशाची भक्तिभावाने पूजा करतात आणि उपवासही करतात. असे सांगतात की, या व्रताचे पालन करणाऱ्यांना गणपती बाप्पाचे आशीर्वाद लाभतात, अडथळे दूर होतात आणि जीवनात आनंद, सौभाग्य वाढते.



शुभ मुहूर्त :


पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी २५ ऑक्टोबर रोजी पहाटे १:१९ वाजता सुरू होऊन २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:४८ वाजेपर्यंत राहील. त्यामुळे या वेळी विनायक चतुर्थी शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. सूर्योदय सकाळी ६:२८ ला तर सूर्यास्त संध्याकाळी ५:४२ वाजता होईल. चंद्रोदय सकाळी ९:५० वाजता आणि चंद्रास्त संध्याकाळी ७:५८ वाजता होईल. या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी ४:४६ ते ५:३७, विजया मुहूर्त दुपारी १:५७ ते २:४२, आणि गोधुली मुहूर्त संध्याकाळी ५:४२ ते ६:०७ या वेळेत राहील.



शुभ योग :


या विनायक चतुर्थीला शोभन योग आणि रवि योग तयार होत आहेत. तसेच रात्रभर भद्रा वास योग राहील. या दिवशी शिवकुटुंबाची पूजा केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते. या योगात गणपतीची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि यश लाभते, असे सांगतात.



पूजा विधी :


विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर घर गंगाजलाने शुद्ध करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपतीची मूर्ती किंवा चित्र स्थापन करावे. त्यानंतर फुले, दुर्वा, पंचामृत, खीर, फळे आणि काजू यांचा नैवेद्य अर्पण करून गणेश मंत्राचा जप करावा. शेवटी आरती करून दिवस उपवासात व्यतीत करावा. मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरीच विधिपूर्वक पूजा करावी. या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा केल्यास गणपती बाप्पा सर्व विघ्नांचा नाश करून भक्ताला समृद्धी, सौभाग्य आणि आनंद प्रदान करतो.

Comments
Add Comment

जेमिमाला दिलेलं वचन सुनील गावस्कर यांनी पाळलं

मुंबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी दिलेले एक खास वचन अखेर पूर्ण झाले आहे. भारतीय संघाने विश्वचषक

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचा ताबा

वॉशिंग्टन : जागतिक इंधन बाजारात मोठी उलथापालथ होत असून, अमेरिकेने व्हेनेझुएलावर प्रत्यक्ष ताबा मिळवल्यानंतर

दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल

सावंतवाडी (वार्ताहर) : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गाडी निर्धारीत वेळेत येण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने