हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले


मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी परिसरात चार कामगारांनी चोर समजून केलेल्या मारहाणीत हर्षल रामसिंग परमा या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सलमान खान, इसमुल्ला खान, गौतम चमार आणि राजीव गुप्ता या चौघांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली.


हर्षल हा आई सुवर्णा आणि वडील रामसिंग परमा यांच्यासह मोतीलाल नगर, गोरेगाव येथे राहत होता. रात्री तो दारू पिण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. पहाटेच्या सुमारास तो राज पॅथ्रोन इमारतीजवळ आला तेव्हा नशेत होता. इमारतीत काम करणाऱ्या चार कामगारांनी चोर समजून हर्षलला घेरले आणि पकडले. हर्षलचे हातपाय बांधून नंतर त्याला मरेपर्यंत चोपले. या मारहाणीत हर्षलचा मृत्यू झाला. हर्षलला बेदम मारहाण करणारे चौघेजण थोड्या वेळाने घटनास्थळावरुन पसार झाले. इमारतीचा सुरक्षारक्षक पप्पू दूधनाथ यादव याने हर्षलला बघितले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येताच हर्षलला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन हर्षलचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि चार कामगारांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी हर्षलची हत्या करणाऱ्या चौघांना शोधले आणि त्यांना अटक केले.


अटक केलेले चौघेजण राज पॅथ्रोन इमारतीत बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होते. दिवसा काम करून ते इमारतीतच राहत असत. प्राथमिक चौकशीत त्यांनी हर्षलला चोर समजून मारहाण केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून बोरिवली येथील स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी इमारत तसेच भोवतालच्या परिसरातल्या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आणि साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे.


Comments
Add Comment

Nashik Simhastha 2027 : कुंभ २०२७साठी एआयची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा, जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली

hydroelectric project : उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

मुंबई : जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री