महादेवाच्या पिंडीवर अवतरली नागदेवता! बघ्यांची उसळली गर्दी

वाडा: तालुक्यातील दुपारेपाडा या गावातील श्री गणेश मंदिरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास या मंदिरातील श्री महादेवाच्या पिंडीवर नागदेवता अवतरली होती ही नागदेवता पिंडीभोवती विळखा घालून दोन अडीच तास असल्याने हे चित्र पाहण्यासाठी मंदिरात भक्तांनी एकच गर्दी केली होती.


दुपारे पाडा या गावात श्री गणेशाचे मंदिर आहे.या मंदिरात गणेशाच्या मूर्ती बरोबर श्री महादेवाची पिंड सुध्दा आहे.या पिंडीवर बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक नाग (सर्प)दिसून आला.हा नागराज सुमारे दोन ते अडीच तास पिंडीला विळखा घालून होता.याचवेळी मंदिरात हरिपाठ चालु होता. पिंडीला विळखा घातलेला असल्याचे एका भक्तांच्या निदर्शनास आले आणि त्यानंतर ही माहिती गावात पसरली.


गावक-यांनी मंदिराकडे धाव घेतली त्यानंतर सोशल मिडीयावर हे व्हायरल होताच हे पाहण्यासाठी आजुबाजूच्या कोने, शिरीष पाडा या गावातील नागरिक ही मंदिरात दाखल झाले त्यामुळे मंदिरात एकच गर्दी झाली होती.


अखेर सर्पमित्रांनी सापाला पकडून वनविभागाच्या अधिका-यांशी बोलून जंगलात सोडून देण्यात आले. ही घटना परिसरात कुतूहलाचा विषय ठरली होती.

Comments
Add Comment

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिककरही सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणार हैराण; तब्बल वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी

नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने

केरळ स्टोरी २ चा टिझर यावेळी अधिक गडद; हिंदू मुलींवर निशाणा....

मुंबई : आजपर्यंत विपुल अमृतलाल शाह यांचे अनेक देशभक्तीपर सिनेमे किंवा सामाजिक प्रश्नांना हात घालणारे सिनेमे आपण

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे

डोंट बी शाय’सह प्राइम व्हिडिओ आणि इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्सच लँडमार्क कोलॅबोरेशन जाहीर

प्राइम व्हिडिओ × इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्स: रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘डोंट बी शाय’मधून नव्या प्रवासाची

मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीने वाढवली निवडणुकीची उत्कंठा

मंडणगड : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना ६-० असा

उल्हासनगरमध्ये महापौरपदासाठी शिवसेना, उबाठा आणि टीओकेत रस्सीखेच

भाजपची रणनीती निर्णायक उल्हासनगर :उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी राजकारण आता केवळ संख्याबळावर