माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड असा सामना रंगला. ज्यात भारताने ५३ धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मृती मानधनाने धमाकेदार फटकेबाजी करत शतक पूर्ण केले. स्मृतीचे हे एकदिवसीय सामन्यातील आतापर्यंतचे १४वे शतक ठरले आहे.


स्मृतीला यावेळी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारल्यावर तिने आपले मनोगत व्यक्त करताना आपली सहकारी प्रतिका रावलचाही पुरस्कारावर तेवढाच हक्क आहे, असे सांगितले. ज्यामुळे तिच्या या एका वाक्यात तिने पुन्हा एकदा सर्वांच्या ह्रदयाला हात घातला. यावेळी स्मृती म्हणाली की, "भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, याचा सर्वात जास्त आनंद आहे. गेले तीन सामने आमच्यासाठी चांगले गेले नव्हते. चांगले क्रिकेट खेळूनही आम्हाला विजय मिळवता येत नव्हता. पण या सामन्यात मात्र आम्ही चांगली कामगिरी करून विजयी ठरलो. मी या विजयासाठी जेवढी पात्र आहे, तेवढीच प्रतिका रावलही आहे."



स्मृतीच्या फटेबाजीमुळे भारताने सामन्याला जोरदार सुरुवात केली होती. ज्यामुळे क्रिकेटप्रेमींना सामना जिंकण्याची चिन्हे दिसत होती. स्मृतीला गेल्या दोन सामन्यांमध्ये शतकाने हुलकावणी दिली होती. स्मृतीन अनुक्रमे ८० आणि ८८ धावा केल्या होत्या. पण या सामन्यात मात्र स्मृतीने ९५ चेंडूंत १०९ धावांची खेळी करत आपले शतक पूर्ण केले. ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते. तर क्रिकेट एकदिवसीय सामन्यांत भागीदारीतून सर्वाधिक धावा करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या एकत्र यादीत स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली आहेत.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत