संगीतकार सचिन संघवीला अटक: तरुणीवर अत्याचार आणि गर्भपाताचे आरोप

मुंबई : बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या गायक आणि संगीतकार सचिन संघवी याच्याविरुद्ध एका २९ वर्षांच्या तरुणीने विलेपार्ले पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे सचिनला अटक झाली होती, पण नंतर त्याला जामीन मिळाला आहे.


पोलिसांनी सचिनवर फसवणूक, अत्याचार आणि महिलेची संमती नसताना गर्भपात केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. आता हे प्रकरण पुढील तपासासाठी सांताक्रूझ पोलिसांकडे देण्यात आले आहे.


एफआयआरमध्ये सांगितल्यानुसार, विलेपार्ले पूर्व येथे राहणारी ही तरुणी गायिका आहे. तिची आणि सचिनची ओळख फेब्रुवारी २०२४ मध्ये इंस्टाग्रामवर झाली होती. सचिनने तिच्या आवाजाचे कौतुक करून तिला आपल्या अल्बममध्ये काम करण्याची ऑफर दिली. कामाच्या निमित्ताने ते एकमेकांना भेटू लागले.


तरुणीने आरोप केला आहे की, सचिन तिला त्याच्या सांताक्रूझ येथील स्टुडिओमध्ये बोलावून भेटायचा आणि तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करेल, असे खोटे आश्वासन त्याने दिले. तो नेहमी सांगायचा की, त्याचे वैवाहिक जीवन चांगले नाही.


पीडितेच्या आरोपानुसार, एप्रिल २०२४ मध्ये सांताक्रूझच्या एका स्टुडिओमध्ये त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मे आणि जून २०२४ मध्ये त्याने त्याच्या घरी आणि परदेशात बुडापेस्ट येथेही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.


२९ जुलै २०२५ रोजी, तरुणीला सचिनच्या फोनमध्ये दुसऱ्या महिलेसोबतचे फोटो आणि चॅट्स दिसले, तेव्हा त्यांच्यात मोठे भांडण झाले. यानंतर दुबईत असताना त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.


४ ऑगस्ट २०२५ रोजी तिला कळले की ती गरोदर आहे. तेव्हा सचिन तिला भेटला आणि त्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी देऊन गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. भीतीमुळे तिने गर्भपात केला. त्यानंतर सचिनने तिच्याशी पूर्णपणे संबंध तोडले. या धक्क्याने ती खूप नैराश्यात गेली होती. अखेर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक