मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांसह केला कचरा, महापालिकेने तब्बल ३,००० टन जमा केला..

मुंबई (खास प्रतिनिधी): दीपावलीच्या पूर्वी करण्यात आलेली साफसफाई आणि या सणाच्या काळात भेटवस्तू तसेच फटाक्यांचा कचरा यामुळे मुंबईतील दैनंदिन कचऱ्यात वाढ झाली आहे. या सणाच्या काळात तब्बल ३ हजार टन अतिरिक्त कचरा निर्माण झाला आहे.


सणासुदीच्या काळात शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या मोठ्या वाढीचा मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) प्रभावीपणे सामना करत शहरात कचऱ्याचा वेळेत व सुरळीत साफसफाई करत शहर आणि उपनगराचा परिसर स्वच्छ राखण्याचा प्रयत्न केला.


गेल्या काही दिवसांत शहरात नेहमीपेक्षा सुमारे ३,००० मेट्रिक टन अतिरिक्त कचरा निर्माण झाला असून त्यापैकी २,०७५ मेट्रिक टन कचरा कांजूर व देवोनार डेपो येथे निपटारा करण्यात आला आहे, तसेच सुमारे १,००० मेट्रिक टन कचरा ट्रान्स्फर स्टेशनवरून उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


सप्टेंबर २०२५ पर्यंत दररोज सरासरी कचरा निपटारा ६,९०० टन इतका होता, तर गेल्या काही दिवसांत तो वाढून ७,३०० टन प्रतिदिन इतका झाला आहे. सणांच्या काळात ही वाढ सरासरी ६००–७०० टन प्रतिदिन इतकी झाली असून, बीएमसीच्या सज्जतेमुळे ही वाढ प्रभावीपणे हाताळण्यात आली आहे.सणासुदीच्या काळात शहरातील सर्व वॉर्डांमध्ये सफाई पथकांनी अतिरिक्त शिफ्टमध्ये काम करून रस्त्यांवरील व संकलन केंद्रांवरील कचरा त्वरित उचलला जात आहे


“सणासुदीच्या काळात अवघ्या काही दिवसांत ३,००० टनांहून अधिक कचरा निर्माण झाला. बीएमसीच्या सर्व पथकांनी दिवस-रात्र काम करून हा अतिरिक्त कचरा वेळेत हाताळला. वेळेत केली गेलेली ही साफसफाई आमच्या सज्जतेचे आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे तथा कार्यतत्परतेच प्रतिक आहे.” - किरण दिघावकर, उपयुक्त (घनकचरा व्यवस्थापन)




 
Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील