Ishwarpur Name : मोठी बातमी, 'इस्लामपूर नव्हे, ईश्वरपूर! अखेर केंद्र सरकारचा नामकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब, पत्र जारी

सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli District) इस्लामपूर (Islampur) शहराच्या नामकरणाच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारची (Central Government) मान्यता मिळाली आहे. यामुळे आता इस्लामपूर शहराच्या नावात कायदेशीररित्या 'ईश्वरपूर' (Ishwarpur) असा बदल होणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी शेवटच्या दिवशी राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली होती. तेव्हा त्यांनी इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर (Ishwarpur) असे करणार असल्याचे सांगितले होते. या नामकरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. आता केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून (Survey of India) या नामकरणाला मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे. या मान्यतेनंतर इस्लामपूर शहराचे नाव आता अधिकृतपणे 'ईश्वरपूर' (Ishwarpur) असे बदलण्यात येणार आहे.



४०-५० वर्षांची मागणी पूर्ण


या नामकरणाची मागणी गेल्या ४० ते ५० वर्षांपासून सातत्याने चर्चेत होती. पंत सबनीस (Pant Sabnis): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी चार-पाच दशकांपूर्वी शहराचे नामकरण 'ईश्वरपूर' करावे, अशी मागणी सर्वप्रथम केली होती. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी डिसेंबर १९८६ मध्ये इस्लामपूर येथील यल्लमा चौकात झालेल्या जाहीर सभेत प्रथमच व्यासपीठावरून 'इस्लामपूर नव्हे, तर हे ईश्वरपूर' असा उल्लेख केला होता. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही सभागृहात 'इस्लामपूर नव्हे, तर हे ईश्वरपूर' अशी घोषणा केली. मंत्रिमंडळाने या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता, ज्याला आता केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. शहराचे नामांतरण 'ईश्वरपूर' झाल्यानंतर यापुढे ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ यासह तालुका, जिल्हा आणि सर्वच शासकीय, निमशासकीय संस्था, व्यवसाय, उद्योग आणि इतर सर्व स्तरावर 'ईश्वरपूर' हेच नाव वापरले जाईल.

Comments
Add Comment

CM Fadnavis's Journey by Vande Bharat Train : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला वन्दे भारतने प्रवास, प्रवासादरम्यान केले फाईल्सचे कामही पूर्ण

मुंबई : पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी बाईकवरून विधान भवनात

Mango Juice Caused Poisoned : "आंब्याचा रस पिल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना झाली विषबाधा !"

अहिल्यानगर : मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबात चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

Online ​​Fraud : फेसबुकवरील एका क्लिकने केला घात! ‘ट्रेडिंग’च्या आमिषाला बळी; सोलापूरातील एजंटची तब्बल ६८ लाखांची फसवणूक

सोलापूर : सोलापूर शहरात ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली मोठी सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. फेसबुकवरील आकर्षक

Pune Rain : पिंपरी चिंचवडच्या पहिल्याच पावसात झाडं कोसळली, वाहतूक विस्कळीत; ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळेला नागरिकांची धावपळ

पुणे : उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काल झालेल्या पावसाने (Rain) मोठा दिलासा दिला. पिंपरी चिंचवड शहरात काल

World's Most Expensive Mango : जळगावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पिकवला जगातील महागडा आंबा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून

Monsoon 2026 : अखेर तारीख ठरली! 'या' तारखेपासून महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा